महाराजांचा एकेरी उल्लेख करणं, औरंगजेबाच्या कबरीला समाधी म्हणणं महाराष्ट्राचा अपमान; आदित्य ठाकरे कडाडले

महाराजांचा एकेरी उल्लेख करणं, औरंगजेबाच्या कबरीला समाधी म्हणणं महाराष्ट्राचा अपमान; आदित्य ठाकरे कडाडले

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त देशाचे गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी किल्ले रायगडावर आले होते. यावेळी रायगडावरून केलेल्या भाषणात शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, तसेच औरंगजेबाच्या कबरीला ‘समाधी’ म्हणाले. याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला.

रविवारी शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांना माध्यम प्रतिनिधींनी शहांच्या विधानाबाबत प्रश्न विचारला. याला उत्तर देताना ते म्हणाले की, भाजपची हीच भूमिका राहिली आहे. जसे महाराष्ट्रावर मुघल, अफझलखान वगैरे आक्रमण करत राहिले तीच महाराष्ट्र लुटण्याची मानसिकता भाजपची आहे.

महाराष्ट्रावर जो चालून येईल त्याला असेच गाडले जाईल, त्याच औरंगजेबाची कबर काही लोकांना समाधी वाटते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेखही एकेरी केला. आम्हाला हिंदुत्वाच्या गोष्टी शिकवतात ते आता कुठे गेले? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच महाराजांचा एकेरी उल्लेख करणे, औरंगजेबाच्या कबरीला समाधी म्हणणे हा महाराष्ट्राचा अपमान असून तो गृहमंत्र्यांनी केला आहे, असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला.

शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या, औरंग्याच्या थडग्याला ‘समाधी’ म्हणणाऱ्यांचा फडणवीस कडेलोट करणार का? – संजय राऊत

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘आधी पटवलं मग केलं लग्न…’, शिंदेंच्या कोकणातील शिलेदाराची अनोखी लव्हस्टोरी, काय सांगितला अफलातून किस्सा? ‘आधी पटवलं मग केलं लग्न…’, शिंदेंच्या कोकणातील शिलेदाराची अनोखी लव्हस्टोरी, काय सांगितला अफलातून किस्सा?
कोकणातील एकनाथ शिंदे गटाचे मातब्बर नेते भरतशेठ गोगावले हे त्यांच्या बेधडक स्वभावामुळे ओळखल्या जातात. कोकणी माणसासारखे ते वरवर कडक वाटत...
लाडकी बहीण योजनेत आठ लाख महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 रुपये मिळणार
सूर्यदेव कोपला, मुंबईत घामाच्या धारा, अनेक जिल्ह्यात पार वाढला, काम असेल तरच बाहेर पडा
मुस्लिम या देशात कायद्यात राहिले तर फायद्यात…धीरेंद्र शास्त्री महाराज नेमके काय म्हणाले?
‘नेहरूंकडून आंबेडकरांचा अपमान, तर मोदींकडून देवतुल्य स्थान’; बाबासाहेबांच्या जयंतीदिनी कंगना यांचं मोठं वक्तव्य
लॉरेन्स बिष्णोईनंतर सलमानचा नवीन दुश्मन कोण? ‘पांड्या’ने का पाठवला धमकीचा मेसेज?
घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलचं ब्रेकअप? व्हिडीओ पोस्ट करत ‘ती’ म्हणाली, ‘जा तुला माफ…’