“तुम्ही बाळासाहेबांचा अपमान नाही केला का?” जया बच्चन यांच्याकडून कामराचे समर्थन अन् थेट एकनाथ शिंदेंना सवाल

“तुम्ही बाळासाहेबांचा अपमान नाही केला का?” जया बच्चन यांच्याकडून कामराचे समर्थन अन् थेट एकनाथ शिंदेंना सवाल

स्टँड-अप कॉमेडिअन कुणाल कामराने त्याच्या गाण्यातून एकनाथ शिंदे यांच्यावर एक टीका केली आहे. जाणूनबुजून अपमानित करण्याचा आणि मोठ्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम करू नये. त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. कामराने माफी मागितली पाहिजे अशी मागणीही त्याच्याकडून केली जात आहे. आता कुणाल कामरा यांनी एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिप्पणी केल्यानंतर एक मोठा वाद निर्माण झाला आहे.

कुणाल कामराच्या वादावार जया बच्चन यांची प्रतिक्रिया

मात्र आता या वादावर जया बच्चन यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून जया बच्चन यांनी कामराला पाठिंबा दिला आहे. इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांप्रमाणे आता अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनीही या विषयावर उघडपणे आपले मत व्यक्त केले आहे. तसेच त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलही बोलल्या आहेत.

कुणाल कामराने हॅबिटॅट कॉमेडी क्लबवर त्यांच्या लाईव्ह शो दरम्यान शिवसेना युवा शाखेच्या सदस्यांनी हल्ला केला. शो बंद करण्यात आला आणि सेटची तोडफोडही करण्यात आली. आता या प्रकरणात केलेल्या कारवाईत आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कुणाल कामराबद्दल जया बच्चन काय म्हणाल्या?

जया बच्चन यांनी या मुद्द्यावर संसदेबाहेर माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, ‘जर बोलण्यावर बंदी असेल तर तुमचे काय होईल?’ तसही तुमची परिस्थिती वाईट आहे. जर तुमच्यावर बंधने आहेत. तुम्हाला फक्त काही विशिष्ट विषयांवर बोलण्यास सांगितलं जात असेल आणि काही प्रश्न विचारू नका असंही सांगितलं जात असेल, तर यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे आहे?”


एकनाथ शिंदेंसाठी जया बच्चन यांनी काय प्रश्न उपस्थित केला

जया बच्चन पुढे म्हणाल्या, ‘एखाद्यावर कारवाई करण्याचे स्वातंत्र्य तेव्हाच असते जेव्हा काही गोंधल होतो जसं की विरोधकांना मारहाण करणे, महिलांसोबत वाईट वागणे, लोकांची हत्या करणे, अजून काय? तुम्ही (एकनाथ शिंदे) तुमचा मूळ पक्ष सोडून फक्त सत्तेसाठी दुसरा पक्ष स्थापन केला. हा बाळासाहेबांचा अपमान नाही का?” असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंवरही प्रश्न उपस्थित केला आहे.

कुणाल कामराला कोणताही पश्चात्ताप नाही

खार पोलिस उपनिरीक्षक विजय यांच्या मते, कुणाल कामराच्या ‘नया भारत स्पेशल’ चित्रपटाच्या रिलीजनंतर हा हल्ला झाला. विनोदी कलाकाराच्या वक्तव्याबद्दल आणि तोडफोडीबद्दल युवा विंगच्या सदस्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आणि आता बातमी अशी आहे की सुमारे 11 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याच वेळी, कुणाल कामरानेही याबाबत त्याला कोणताही पश्चाताप नसल्याचं म्हटलं आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्र होरपळला, उष्माघाताचा पहिला बळी, धरणातील जलसाठा झाला कमी महाराष्ट्र होरपळला, उष्माघाताचा पहिला बळी, धरणातील जलसाठा झाला कमी
होळी संपल्यानंतर उन्हाचा पारा वाढला आहे. महाराष्ट्र होरपळला आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. जणू राज्यावर सूर्य देव कोपला...
‘डाळ पुरावी म्हणून जास्त पाणी घालायचो…’ शाहरुख खानने सांगितला तो बालपणीचा संघर्ष
“मला अशी पत्नी नको जी..”; अमिताभ बच्चन यांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट, जया यांच्याकडून खुलासा
मुस्लीम पत्नीसाठी हिंदू अभिनेता करतोय रोजा; इस्लामबद्दल म्हणाला “खूप कठीण..”
Katrina Kaif- कतरिना कैफ का गेली पाकिस्तानला? वाचा सविस्तर
आयाराम गयाराम… कोर्टाने हस्तक्षेप केला नाही तर ते 10व्या अनुसूचीची थट्टा ठरेल! महाराष्ट्रातील राजकारणावर SC ची महत्त्वाची टिप्पणी
स्तन दाबने बलात्कार नाही, ‘या’ निर्णयावरून सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्तींना झापले; म्हणाले अत्यंत असंवेदनशील आणि…