उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर लोटांगण घातले? कोणी केला आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर लोटांगण घातले? कोणी केला आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

शिवसेनेत बंडखोरीनंतर दोन्ही गटाकडून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. खरी शिवसेना कोणाची? याबाबत दोन्ही गट आपलाच दावा करत आहे. परंतु आता शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. भाजपवर नेहमी आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर लोटांगण घातले होते, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.

तपास यंत्रणांच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर लोटांगण घातले, असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केला. दिल्लीत जाऊन मला वाचवा, राज्यात युती सरकार स्थापन करु, असे सांगून आलेल्या ठाकरे यांनी राज्यात आल्यावर पलटी मारली, असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठावर केला.

संभाजी महाराजांवर बोलण्याचा अधिकार नाही…

राज्य सरकारच्या वतीने आज उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विधान परिषदेत निवेदन सादर केले. ते पुढे म्हणाले की, सत्तेसाठी उबाठा शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सोडले आणि औरंगजेबी विचार स्वीकारले आणि काँग्रेससोबत गेले. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवले त्यांच्याबरोबर तुम्ही सत्तेसाठी गेलात, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. काँग्रेसकडे गहाण टाकलेला धनुष्यबाण आणि शिवसेनेला आम्ही अडीच वर्षांपूर्वी धाडस करुन सोडवले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. औरंगजेबाचे विचार स्वीकारल्याने तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांवर बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना उबाठा गटाला यावेळी सुनावले.

महाविकास आघाडीकडून षडयंत्र

आपण कधी सत्तेचा आणि खुर्चीचा कधीच मोह केला नाही. खुर्चीपाठी बसलेल्या माणसांच्या अडचणी सोडवण्याला कायम प्राधान्य दिले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महाविकास आघाडी सरकार असताना देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांना जेलमध्ये टाकण्याचे षडयंत्र केले होते. मात्र आम्ही मंत्रीपदावर लाथ मारली, उठाव करुन महाविकास आघाडी सरकारचा टांगा पलटी केला आणि महायुतीचे सरकार आणले, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात सांगितले.

आता महाराष्ट्रात फिरु लागले

उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन केले पाहिजे. पूर्वी आमदारांना मंत्र्यांना ते भेटत नव्हते. आता गटप्रमुखांना ते भेटतात. आता ही सुधारणा झाली आहे. मी डॉक्टर नसलो तरी हा उपचार केला आहे. ऑपरेशन केले आहे. आता लोक तरातरा फिरू लागले आहे. महाराष्ट्रात दिसू लागले आहे. त्याचे क्रेडिट आता मला दिले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता शिंदे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जळगावच्या चोपडा एसटी बसस्थानकात गुजरात पॅटर्न, बसपोर्टच्या धर्तीवर विकास जळगावच्या चोपडा एसटी बसस्थानकात गुजरात पॅटर्न, बसपोर्टच्या धर्तीवर विकास
राज्यातील एसटी स्थानकांचा बीओटी ( बांधा वापरा आणि हस्तांतरित करा) तत्वावर विकास करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार...
Boat Drowned – भाविकांची धरणात बोट बुडाली; 7 भाविक बेपत्ता, 8 जणांना सुखरुप वाचवले
हजारो लोकं अश्रू ढाळताहेत…! बिल्डरांकडून होणाऱ्या फसवणुकीवर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
तेव्हा एकनाथ शिंदे मोदींच्या डस्टबिनमध्ये होते; उद्धव ठाकरे यांचा सणसणीत टोला
मुख्यमंत्री म्हणाले नागपूर दंगल पूर्वनियोजित; सोशल मीडियावर ‘चल दंगल समजून घेऊ’ कविता पुन्हा चर्चेत
Buldhana News – पाडकाम करताना घर अंगावर कोसळलं, बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू
गुहागरच्या खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात बोगस प्रवेश अन् करोडोंचा गैरव्यवहार, भास्कर जाधव यांचा खळबळजनक आरोप