Nagpur violence नागपूरमधील दंगलग्रस्त भागात संचारबंदी लागू, शहरात तणावपूर्ण शांतता

Nagpur violence नागपूरमधील दंगलग्रस्त भागात संचारबंदी लागू, शहरात तणावपूर्ण शांतता

औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकारण सुरू असून नागपुरात (Nagpur violence) त्याचे पडसाद उठल्याचे पाहायला मिळाले. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरून सोमवारी, 17 मार्च रोजी दिवसभर राज्याच्या विविध भागांमध्ये निदर्शने सुरू होती. त्यानंतर रात्री नागपुरात मोठा तणाव निर्माण झाला. दोन गटात झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनांनी नागपूर हादरले आहे. सध्या नागपुरात तणावपूर्ण शांतता असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, कलम 163 अंतर्गत नागपूर शहरातील अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

रात्री दोन गटात निर्माण झालेला तणाव आणि उसळलेली दंगल यानंतर पोलिसांनी कारवाई करत जमावाला पांगवले. जागोजागी पोलिसांच्या तुकड्या उभ्या करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. नागपूर पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, पुढील सूचना मिळेपर्यंत निर्बंध लागू राहतील. कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर येथील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारंबदी लागू करण्यात आली आहे.

नागपूर शहरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा कर्फ्यू लागू राहील: डॉ. रविंदर कुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नागपूर

तसेच काही जणांवर कारवाई करण्यात आली असून अन्य आरोपींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती देखील पोलीस आयुक्तांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राजकीय हवा तापली असली तरी राज्यातील पारा घसरणार? उन्हाच्या काहीलीतून होणार सुटका, हलक्या सरी कोसळणार राजकीय हवा तापली असली तरी राज्यातील पारा घसरणार? उन्हाच्या काहीलीतून होणार सुटका, हलक्या सरी कोसळणार
राज्यात गेले काही दिवस नैसर्गिक आणि राजकीय तापमान वाढले आहे. मात्र, येत्या काही दिवसात तापमान घटणार असून काही ठिकाणी हलक्या...
पाकिस्तानातील अब्बांची आठवण होईल, अशी शिक्षा देणार…नागपुरात हिंसाचार करणाऱ्यांना नितेश राणेंचा इशारा
औरंगजेबाची कबर देशाच्या बाहेर टाकून द्या; उदयनराजे भोसले कडाडले
महागड्या हॉटेलमध्ये मजा केली; अभिषेक बच्चनचा ४ वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीसोबतचा फोटो पाहून नेटकऱ्याने केली कमेंट
औरंगजेब कबरीमुळे राज्यात तणावपूर्ण वातावरण, मराठी गायक म्हणाला, आपल्याला शत्रुची गरज नाही कारण…
“ममता कुलकर्णीने इस्लाम धर्म स्विकारला असता तर वाद झाले असते?”, लक्ष्मी नारायण त्रिपाठींचे खळबळजनक विधान
बदलत्या हवामानात लहान मुलांना ‘हे’ पदार्थ खायला देऊ नका, तज्ज्ञांकडून जाणून घ्या