मिंध्यांना डम्पिंगचा प्रश्न सोडवता आला नाही, ठाणे पालिकेची अब्रू गेली; कचरा झाकण्याची वेळ!

मिंध्यांना डम्पिंगचा प्रश्न सोडवता आला नाही, ठाणे पालिकेची अब्रू गेली; कचरा झाकण्याची वेळ!

अनेक वर्षे सत्तेत असलेल्या मिंध्यांना शहरातील कचऱ्याच्या डम्पिंगचा प्रश्न सोडवता न आल्याने ठाणे पालिकेची अबू गेली आहे. शहरात जागोजागी साचलेला कचरा झाकण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. कचरा उचलला न गेल्याने संपूर्ण शहरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. चौकाचौकात कचऱ्याचे महाकाय ढीग लागल्याने नागरिकांनी पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे.

ठाणे शहरात गेल्या आठवड्यापासून कचरा उचलला जात नसल्याने कचरा संकलनाचे व्यवस्थापन संपूर्णपणे कोलमडले आहे. सीपी तलाव या ठिकाणी कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे, तर वागळेमध्ये कचरा टाकण्याला विरोध करण्यात आला आहे. दुसरीकडे आतकोनीमध्ये कचरा वाहून नेण्यासाठी जास्त कालावधी जात असल्याचे कारण प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. मात्र या सर्व गोंधळात शहरात रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत. मात्र आता शहरातील सोसायट्यांमध्येही मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून कचरा वाहून नेणारी घंटागाडी सोसायट्यांमध्ये आली नसल्याने कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न सोसायट्यांमधील नागरिकांना पडला आहे.

घरातच साठवला जातोय कचरा
सोसायट्यांमधील आवारात कचऱ्याचे ड्रम ओसंडून वाहत आहेत, तर इमारतींमधील नागरिक बाहेर रस्त्यावर कचरा टाकू शकत नसल्याने हा कचरा आता घरातच साठवला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचादेखील प्रश्न निर्माण झाला आहे. समतानगरमधील अनेक मोठ्या गृहसंकुलांमध्ये हा विषय गंभीर झाल्याने नागरिकांकडून ठाणे पालिका प्रशासनाच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे.

ठाणेकर आंदोलनाच्या पवित्र्यात
नेमकी कचराकोंडी कशामुळे झाली आहे, कचरा न उचलण्याचे नेमके कारण काय, असा संभ्रम नागरिकांमध्ये पसरला आहे. घरात लहान मुले असल्याने मुलांच्याही आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून पालिकेने हा कचरा तत्काळ नेला नाही तर नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

माजिवडा, मानपाडा, घोडबंदर आणि वागळे इस्टेट रस्त्यावरील कचरा उचलण्याचे काम सुरू आहे. इतर भागारील साचलेल्या कचऱ्याचा नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून कचरा झाकला जात आहे. ३ ते ४ दिवसांत कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यात प्रशासनाला यश येईल.
– मनीष जोशी (घनकचरा उपायुक्त ठाणे महापालिका

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राजकीय हवा तापली असली तरी राज्यातील पारा घसरणार? उन्हाच्या काहीलीतून होणार सुटका, हलक्या सरी कोसळणार राजकीय हवा तापली असली तरी राज्यातील पारा घसरणार? उन्हाच्या काहीलीतून होणार सुटका, हलक्या सरी कोसळणार
राज्यात गेले काही दिवस नैसर्गिक आणि राजकीय तापमान वाढले आहे. मात्र, येत्या काही दिवसात तापमान घटणार असून काही ठिकाणी हलक्या...
पाकिस्तानातील अब्बांची आठवण होईल, अशी शिक्षा देणार…नागपुरात हिंसाचार करणाऱ्यांना नितेश राणेंचा इशारा
औरंगजेबाची कबर देशाच्या बाहेर टाकून द्या; उदयनराजे भोसले कडाडले
महागड्या हॉटेलमध्ये मजा केली; अभिषेक बच्चनचा ४ वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीसोबतचा फोटो पाहून नेटकऱ्याने केली कमेंट
औरंगजेब कबरीमुळे राज्यात तणावपूर्ण वातावरण, मराठी गायक म्हणाला, आपल्याला शत्रुची गरज नाही कारण…
“ममता कुलकर्णीने इस्लाम धर्म स्विकारला असता तर वाद झाले असते?”, लक्ष्मी नारायण त्रिपाठींचे खळबळजनक विधान
बदलत्या हवामानात लहान मुलांना ‘हे’ पदार्थ खायला देऊ नका, तज्ज्ञांकडून जाणून घ्या