वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना कोणतीही सहानुभूती न दाखवता कठोर दंड व्हायलाच हवा! आदित्य ठाकरे यांची मागणी

वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना कोणतीही सहानुभूती न दाखवता कठोर दंड व्हायलाच हवा! आदित्य ठाकरे यांची मागणी

राज्याच्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात मंगळवारी प्रश्नोत्तरांच्या तासात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वाहतुकीबाबतचा प्रश्न उपस्थित केला. वाहतूक सुरक्षिततेकडे त्यांनी परिवहन मंत्र्यांचे लक्ष वेधले. तसेच रोड रेज करणाऱ्यांना, बेफिकीरीने वाहने हाकणाऱ्यांना आणि उलट्या दिशेने वाहन चालवणाऱ्यांना कोणतीही सहानुभूती न दाखवता कठोर दंड व्हायलाच हवा, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.

याबाबत एक्सवर पोस्ट करण्यात आली आहे. त्यात आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात, गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत मी परिवहन मंत्र्यांना विचारलं की, ते रस्त्यावर अधिक वाहतूक पोलिस तैनात करण्यास तयार होतील का, जेणेकरून वाहतूक सुरक्षिततेसाठी तिथल्या तिथे हस्तक्षेप करणारं कोणी असेल? असेही त्यांनी विचारले आहे.

जे बेफिकीरीने वाहन चालवतात, उलट्या दिशेने वाहन चालवतात किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात, त्यांना प्रत्यक्ष थांबवून कठोर दंड करण्यात येईल का? मंत्र्यांच्या उत्तराने मी पूर्णतः समाधानी नव्हतो, पण मला आशा आहे की शासन रस्त्यांवर वाहतूक पोलिसांची उपस्थिती वाढवेल, जेणेकरून वाढत्या वाहतूक नियम भंगांवर नियंत्रण ठेवता येईल आणि त्यामुळे होणारे अपघात रोखता येतील. रोड रेज करणाऱ्यांना, बेफिकीरीने वाहने हाकणाऱ्यांना आणि उलट्या दिशेने वाहन चालवणाऱ्यांना कोणतीही सहानुभूती न दाखवता कठोर दंड व्हायलाच हवा, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यातील शिवाजी महाराजांच्या पहिल्या भव्य मंदिराचे काम पूर्ण, या तारखेला लोकार्पण राज्यातील शिवाजी महाराजांच्या पहिल्या भव्य मंदिराचे काम पूर्ण, या तारखेला लोकार्पण
Chatrapati Shivaji Maharaj Mandir Bhiwandi: शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य मंदिर उभारले गेले आहे. भिवंडीवाडा...
आठ वर्षांनी लहान हिंदू अभिनेत्याशी लग्न; रमजानबद्दल मुस्लीम अभिनेत्री म्हणाली “मी एकटीच..”
अपघात नाही हत्या…, ‘सूर्यवंशम’ फेम सौंदर्याच्या मृत्यूप्रकरणी नवा ट्विस्ट, 22 वर्षांनंतर धक्कादायक कारण समोर
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विकी कौशलची भावूक पोस्ट; ‘काही भूमिका..’
‘लय भारी’चे पत्रकार तुषार खरात यांच्यावरील खोटे गुन्हे रद्द करा, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. देशमुख यांची मागणी
Crime news – अंत्यविधीसाठी जाणे महागात पडले, चोरट्यांनी केले घर साफ!
Hibiscus Flower- जास्वंदीचे फूल फक्त केसांसाठी नाही तर, चेहऱ्यावर चमक आणण्यासाठीही उपयुक्त!