Crime news – अंत्यविधीसाठी जाणे महागात पडले, चोरट्यांनी केले घर साफ!

Crime news – अंत्यविधीसाठी जाणे महागात पडले, चोरट्यांनी केले घर साफ!

सलामपुरेनगरात चोरट्यांनी अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरावर डल्ला मारून तब्बल 61 हजार 700 रुपयांचा ऐवज लंपास केला. पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सलामपुरेनगरात राहणारे जनार्धन लक्ष्मण मोरे (वय – 64) यांच्या निपाणी नामगाव ता. नेवासा येथील नातेवाईकाचे निधन झाले होते. त्यामुळे ते 8 मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता कुटुंबासह गेले होते. तेथून 11 मार्च रोजी सकाळी 5 वाजता शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांना फोनवरून चोरी झाल्याची माहिती दिली. त्यांनी घरी येऊन पाहणी केली असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले होते. घरामध्ये सामान अस्ताव्यस्त पडले होते. त्यांनी घरात ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंची पाहणी केली असता त्यात तीन तोळे सोन्याचे गंठण, चांदीचे दोन छोटे ग्लास, चांदीचा देवीचा शिक्का, चांदीचे एक फुलपात्र असा एकूण 61 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले.

गटातटामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले

एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपाशीर्वादाने अनेकजणांनी ठाण्यात पुन्हा आपले पाय रोवले आहेत. त्यातच आपलाही एक हस्तक ठाण्याचा असावा त्यासाठी काहींची खास बदली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे ठाण्यात गट-तट झाल्याची चर्चा आहे. परिणामी त्याचा परिणाम कायदा आणि सुव्यवस्थेवर होत आहे. ठाण्यात अधिकारी वाढले तशा घटनाही वाढत असल्याने पोलिसांचा वचक कायम ठेवण्याची गरज असल्याची चर्चा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दीड महिन्याच्या बाळाचे अपहरण, मुंबई पोलिसांनी प्रकरणाचा लावला छडा, चौघांना ठोकल्या बेड्या दीड महिन्याच्या बाळाचे अपहरण, मुंबई पोलिसांनी प्रकरणाचा लावला छडा, चौघांना ठोकल्या बेड्या
मुंबई, वनराई पोलिसांनी दीड महिन्याच्या मुलाच्या अपहरण प्रकरणाची उकल केली आहे आणि एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात...
‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका…’, जयंत पाटील यांचा रोख काय?
संजय दत्तची पहिली पत्नी होती एवढी सुंदर; पाहून म्हणाल कोणत्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही
अमिताभ बच्चन यांच्यासोबत प्रेमसंबंध ठेवून रेखाने स्वतःचं आयुष्य…, अभिनेत्रीच्या वडिलांचं मोठं वक्तव्य
लग्नाबाबत ‘द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्री स्पष्टच बोलली, ‘माझ्यासाठी ते वाईट स्वप्नासारखं..’
गरम वाफा, जीव गुदमरत होता, ड्रायव्हरचा उद्धटपणा; मराठी अभिनेत्याला शिवशाहीच्या प्रवासाचा भयानक अनुभव, पोस्टद्वारे संताप व्यक्त
नवऱ्याला परक्या स्त्रीसोबत पाहून अभिनेत्रींना ‘या’ बसला मोठा धक्का, चौथ्या अभिनेत्रीबद्दल जाणून व्हाल हैराण