बलात्कार करणाऱ्या नराधमांना नपुंसक करा – राज्यपाल हरिभाऊ बागडे

बलात्कार करणाऱ्या नराधमांना नपुंसक करा – राज्यपाल हरिभाऊ बागडे

महिला अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी गुन्हेगारांना जरब बसेल, अशी शिक्षा झाली पाहिजे. महिलांची छेडछाड करणाऱ्यांना बेदम चोप दिला पाहिजे आणि बलात्कार करणाऱ्या नराधमांना नपुंसक करून सोडून दिले पाहिजे, तरच असे गुन्हे कमी होतील, असे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडेंनी म्हटले आहे.

भरतपूर जिल्हा बार असोसिएशनच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. एखाद्या महिलेशी गैरवर्तन होत असताना लोक त्याचा व्हिडिओ बनवतात हे योग्य नाही. एखाद्या महिलेचा विनयभंग होत असेल तर त्या पुरुषाला पकडा. तो माणूस आहे आणि तुम्हीही माणूस आहात. जर तुम्ही हिंमत केली तर तुमच्यासोबत आणखी  2 ते 4 लोक येतील. घटनास्थळी जाऊन संबंधिताला चोप द्यायचा, ही मानसिकता आपल्या मनात आल्याशिवाय हे गुन्हे थांबणार नाहीत, असे बागडे म्हणाले.

शिवरायांच्या शिक्षेचा दाखला

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य होते, तेव्हा पाटील गावाचा प्रमुख असायचा. एका पाटलाने एका तरुणीवर अत्याचार केला. ते दुष्कृत्य समोर येताच शिवाजी महाराजांनी अत्याचार करणाऱ्याला जीवे मारू नका, त्याचे त्याचे हातपाय तोडून त्याला सोडून द्या, असे सांगितले. तो मरेपर्यंत तशाच अवस्थेत राहिला, असा शिक्षेचा दाखला हरिभाऊ बागडे यांनी दिला.

कायद्याचा धाक कसा राहील याचा विचार करा

गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटते की नाही हेच कळत नाही. सध्या आपल्या देशात १२ वर्षांखालील मुलीवर लैंगिक अत्याचार किंवा विनयभंग केला तर फाशीची तरतूद आहे, पण तरीही अशा घटना थांबत नाहीत. महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कायद्याचा धाक कसा राहील याचा विचार करण्याची गरज असल्याचे बागडे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दीड महिन्याच्या बाळाचे अपहरण, मुंबई पोलिसांनी प्रकरणाचा लावला छडा, चौघांना ठोकल्या बेड्या दीड महिन्याच्या बाळाचे अपहरण, मुंबई पोलिसांनी प्रकरणाचा लावला छडा, चौघांना ठोकल्या बेड्या
मुंबई, वनराई पोलिसांनी दीड महिन्याच्या मुलाच्या अपहरण प्रकरणाची उकल केली आहे आणि एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात...
‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका…’, जयंत पाटील यांचा रोख काय?
संजय दत्तची पहिली पत्नी होती एवढी सुंदर; पाहून म्हणाल कोणत्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही
अमिताभ बच्चन यांच्यासोबत प्रेमसंबंध ठेवून रेखाने स्वतःचं आयुष्य…, अभिनेत्रीच्या वडिलांचं मोठं वक्तव्य
लग्नाबाबत ‘द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्री स्पष्टच बोलली, ‘माझ्यासाठी ते वाईट स्वप्नासारखं..’
गरम वाफा, जीव गुदमरत होता, ड्रायव्हरचा उद्धटपणा; मराठी अभिनेत्याला शिवशाहीच्या प्रवासाचा भयानक अनुभव, पोस्टद्वारे संताप व्यक्त
नवऱ्याला परक्या स्त्रीसोबत पाहून अभिनेत्रींना ‘या’ बसला मोठा धक्का, चौथ्या अभिनेत्रीबद्दल जाणून व्हाल हैराण