Champions Trophy 2025 – टीम इंडियाच्या विजयानंतर धुडगूस घालणं महागात पडलं, पोलिसांनी मुंडन करून गावभर फिरवलं

Champions Trophy 2025 – टीम इंडियाच्या विजयानंतर धुडगूस घालणं महागात पडलं, पोलिसांनी मुंडन करून गावभर फिरवलं

दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत हिंदुस्थानने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. तब्बल 12 वर्षानंतर हिंदुस्थानने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि देशभरात जल्लोष सुरू झाला. लोक रस्त्यावर उतरले, ढोल-ताशांचा गजरात लोक नाचू लागले आणि फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. काही ठिकाणी तरुणांनी धुडगूसही घातला. असाच प्रकार मध्य प्रदेशमधील देवास जिल्ह्यातही घडला. आता या प्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई करत धुडगूस घालणाऱ्यांना ताब्यात घेत मुंडन केले आणि त्यांची परेड काढली.

रविवारी रात्री हिंदुस्थानी संघाने चॅम्पियन्स ट़्रॉफी जिंकला आणि त्यानंतर देवास जिल्ह्यातील तरुण रस्त्यावर उतरले. तरुण चुकीच्या पद्धतीने फटाक्यांची आतषबाजी करू लागले. यामुळे आजूबाजूच्या लोकांच्या जीवितास आणि इमारतींनाही धोका निर्माण झाला. यावेळी स्टेशन प्रभारी अजय सिंह गुर्जर यांनी घटनास्थळी पोहोचत तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. पोलिसांशी गैरवर्तन करत वाहनाचा पाठलाग केला आणि त्यावर दगडफेक केली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.

त्यानंतर पोलिसांनी 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापैकी दोघांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांचे जबरदस्ती मुंडन केले आणि त्यांची धिंड काढली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या स्थानिक आमदार गायत्रीराजे पवार यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली आणि पोलीस अधीक्षक पुनीत गेहलोत यांची भेट घेतली.

हे तरुण हिंदुस्थानचा विजय साजरा करत होते. ते रेकॉर्डवरील गुन्हेगार नाहीत. त्यांचे मुंडन करून त्यांची अशी सार्वजनिकरित्या धिंड काढणे चुकीचे आहे, असे गायत्रीराजे पवार म्हणाल्या.  हा मुद्दा आपण विधीमंडळात उपस्थित करणार आहे, असे त्या म्हणाल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दीड महिन्याच्या बाळाचे अपहरण, मुंबई पोलिसांनी प्रकरणाचा लावला छडा, चौघांना ठोकल्या बेड्या दीड महिन्याच्या बाळाचे अपहरण, मुंबई पोलिसांनी प्रकरणाचा लावला छडा, चौघांना ठोकल्या बेड्या
मुंबई, वनराई पोलिसांनी दीड महिन्याच्या मुलाच्या अपहरण प्रकरणाची उकल केली आहे आणि एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात...
‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका…’, जयंत पाटील यांचा रोख काय?
संजय दत्तची पहिली पत्नी होती एवढी सुंदर; पाहून म्हणाल कोणत्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही
अमिताभ बच्चन यांच्यासोबत प्रेमसंबंध ठेवून रेखाने स्वतःचं आयुष्य…, अभिनेत्रीच्या वडिलांचं मोठं वक्तव्य
लग्नाबाबत ‘द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्री स्पष्टच बोलली, ‘माझ्यासाठी ते वाईट स्वप्नासारखं..’
गरम वाफा, जीव गुदमरत होता, ड्रायव्हरचा उद्धटपणा; मराठी अभिनेत्याला शिवशाहीच्या प्रवासाचा भयानक अनुभव, पोस्टद्वारे संताप व्यक्त
नवऱ्याला परक्या स्त्रीसोबत पाहून अभिनेत्रींना ‘या’ बसला मोठा धक्का, चौथ्या अभिनेत्रीबद्दल जाणून व्हाल हैराण