जॉयमाल्या सुप्रीम कोर्टात न्यायाधीश

जॉयमाल्या सुप्रीम कोर्टात न्यायाधीश

कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जॉयमाल्या हे सर्वोच्च न्यायालयात नवीन न्यायाधीश असतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या कॉलेजियमने त्यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे पाठवली होती.

न्यायाधीश बागची यांना सर्वोच्च न्यायालयात मोठा कार्यकाळ मिळणार आहे. ते मे 2031 मध्ये न्यायाधीश के. व्ही विश्वनाथन यांच्या निवृत्तीनंतर सरन्यायाधीश बनतील. याआधी कोलकाता हायकोर्टाच्या कोटय़ातून अल्तमस कबीर हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले होते. 18 जुलै 2013 रोजी सरन्यायाधीशाच्या रूपात न्यायमूर्ती अल्तमस कबीर यांच्या निवृत्तीनंतर कोलकाता हायकोर्टातून कोणीही सरन्यायाधीश बनले नाही. 2 ऑक्टोबर 2031 रोजी जॉयमाल्या हे निवृत्त होतील. म्हणजेच त्यांना सरन्यायाधीश म्हणून चार महिन्यांहून अधिक कार्यकाळ मिळेल. सरन्यायाधीश होण्याआधी ते सहा वर्षांपर्यंत सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती म्हणून काम पाहतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

संत तुकाराम महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचे अनावरण संत तुकाराम महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचे अनावरण
संत तुकाराम महाराजांच्या 375व्या बीज सोहळ्यानिमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (दि. 11)...
कोल्हापुरातील ‘कुष्ठधाम’च्या वास्तूला आग
धक्कादायक… बांगलादेशींकडे हिंदुस्थानचे जन्म दाखले, हायकोर्टाने घेतली गंभीर दखल; बोगस कागदपत्रांच्या आधारे घेताहेत मतदान कार्ड
शिंदेंच्या आनंदाचा शिधा संपला! फडणवीसांचं ठरलंय… शिंदेंच्या योजना एकामागून एक गुंडाळण्याचा धडाका
गोरेंविरोधात तक्रार करणाऱ्या पीडित महिलेला पुन्हा धमक्या, तुषार खरातसारखे तुझेही हाल करू
लोकल ट्रेनवर फुगे फेकणाऱ्यांची खैर नाही! पोलिसांची करडी नजर; रेल्वे प्रशासन दंडात्मक कारवाई करणार
राज्यात तीन वर्षांत रस्ते अपघातांत 46 हजार जणांचा मृत्यू, ड्रग्ज सेवनाची चाचणी करण्यासाठी उपकरणे