Sanjay Raut News : वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे हे सामाजिक कार्यकर्ते, म्हणून.. ; राऊतांची खोचक टीका

धनंजय मुंडे, कृष्णा आंधळे, वाल्मिक कराड हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. गृहखातं सांभाळण्यासाठी आणि पोलीस खातं बघण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातून वेळच मिळत नाही. त्यामुळे त्यांचे हे सामाजिक कार्यकर्ते विनयभंग करतात, अशी खोचक टीका शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. तत्पूर्वी पत्रकार परिषद घेऊन राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. जिकडे सत्ताधारी तिकडे व्यभिचारी अशीही टीका त्यांनी केली.

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी विधानसभा विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेना उबाठाचा दावा असल्याचं देखील म्हंटलं. विधानसभेत विरोधी पक्षनेता नसेल तर भ्रष्टाचार वाढेल, असंही त्यांनी म्हटलं. देशातील अनेक राज्यात पाच सदस्य असताना देखील विरोधी पक्षनेतेपद दिले गेले असल्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात तर विरोधी पक्षांकडे एकत्रित 50 आमदारांचे संख्याबळ आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेला एक परंपरा आहे. त्यानुसार विरोधी पक्ष नेते नेतेपद देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचंही राऊत म्हणाले. विरोधी पक्ष नेते पदावरील संभाव्य उमेदवार कोण असेल? याबाबत मात्र संजय राऊत यांनी उत्तर देण्याचं टाळलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक; मुंडेंच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं? मोठी बातमी समोर फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक; मुंडेंच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं? मोठी बातमी समोर
मोठी बातमी समोर येत आहे, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे...
तारीख पे तारीख! देशभरातील न्यायालयांमध्ये 5.25 कोटींहून अधिक खटले प्रलंबित
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी तिघांना अटक, चौकशीसाठी अल्पवयीन मुलगा ताब्यात
मिंधे नाकर्ते आहेत हे वारंवार सिद्ध झालंच होतं, आज त्यावर शिक्कामोर्तब झालं! आदित्य ठाकरे यांचा घणाघात
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्ती वाढल्या, मुख्यमंत्री मात्र मौन – सुनील प्रभू
विधानपरिषदेच्या 5 रिक्त जागेवर निवडणूक कार्यक्रम जाहीर; 27 मार्च रोजी मतदान प्रकिया
थकीत देण्यांच्या बोजाने एसटी वाकली, अर्थसंकल्पात आर्थिक पॅकेज जाहीर करा, कामगार युनियनची मागणी