‘गंगेत डुबक्या मारण्यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय द्या’, संजय देशमुख यांची टीका

‘गंगेत डुबक्या मारण्यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय द्या’, संजय देशमुख यांची टीका

सामान्य माणसांची कामे सोडून महायुती सरकारच्या तिन्ही पक्षांमध्ये भांडणे सुरु आहेत. शिंदे गटाच्या कामावर स्टे देण्याचा सपाटा या सरकारमधील मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) यांनी लावला आहे. तुमच्या तुमच्यातच एकमत नाही तर, या गरीब आणि सामान्य शेतकऱ्यांना तुम्ही काय न्याय देणार आहात, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख म्हणाले आहेत.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने यवतमाळ येथे आंदोलन करण्यात आलं. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत. संजय देशमुख म्हणाले की, ”कुठेत आपले पालकमंत्री? गंगेत डुबक्या मारण्यापेक्षा या भागातील गरीब, सामान्य, बंजारा, शेतकऱ्यांना न्याय द्या. या ठिकाणी भ्रष्टाचार वाढला आहे.”

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ”महायुतीतील तिन्ही पक्षांनी आम्ही सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असं सांगितलं होतं, शेतकऱ्याच्या मालाची खरेदी करण्यासाठी या ठिकाणी खरेदी केंद्र सुरु, असंही सांगितलं होतं. काही दिवस सोयाबीन, कापूसची खरेदी झाली. मात्र काही दिवसांत हे बंद सुद्धा झालं. हे सरकार लोकांना खोटे आश्वसन देऊन सत्तेत आलं आहे. सत्तेत आल्यानंतर त्यांना आश्वासनांचा विसर पडला आहे.” त्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पुरतात करण्याची मागणी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Upcoming bikes in March – मार्चमध्ये लॉन्च होणार ‘या’ 3 पॉवरफुल बाईक्स, पाहा लिस्ट Upcoming bikes in March – मार्चमध्ये लॉन्च होणार ‘या’ 3 पॉवरफुल बाईक्स, पाहा लिस्ट
नवीन बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी मार्च महिना खूप चांगला ठरू शकतो. रॉयल एनफील्डपासून ते टीव्हीएस मोटरपर्यंत दुचाकी उत्पादक कंपनी आपली नवीन...
सत्तेसाठी आश्वासनांचा पाऊस पाडत महायुतीने शेतकरी आणि मच्छिमारांना फसवले, काँग्रेसचे रत्नागिरीत आंदोलन
‘संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येचे फोटो समोर… मुख्यमंत्र्यांनी ठरवले तर…,’ काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
रात्रभर या कुशीवरुन त्या कुशीवर होताय ? या घटकाची असू शकते कमतरता, तज्ज्ञांकडून माहीती जाणा
काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान कार्यकत्यांनीच नेत्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
संतोष देशमुख हत्येचे भयावह फोटो व्हायरल…अजून किती पुरावे हवे? जनतेचा सवाल
फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक; मुंडेंच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं? मोठी बातमी समोर