ऊसाने भरलेल्या बैलगाडीला दुचाकीची धडक; अपघातात अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
बीड जिल्ह्यातील पाटोद्याहून छत्रपती संभाजीनगर येथे परीक्षेसाठी जाणार्या अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्याची दुचाकी विरुद्ध दिशेने येणार्या उसाने भरलेल्या बैलगाडीला धडकली. या अपघातात चैतन्य वैद्यनाथ जायभाये (वय 20 रा. काकडहिरा, ता. पाटोदा, जि. बीड) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. हा अपघात धुळे ते सोलापूर महामार्गावर सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जालन्यातील वडीगोद्री डाव्या कालव्या जवळ झाला.
पाटोदा तालुक्यातील काकडहिरा येथील चैतन्य वैद्यनाथ जायभाये हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. त्याची छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी परीक्षा होती. ही परीक्षा देण्यासाठी चैतन्य पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारस काकडहिरा येथील घरून छत्रपती संभाजीनगरकडे दुचाकीवर निघाला होता. सकाळी वडीगोद्री डाव्या कालव्याजवळ विरुद्ध दिशेने येणार्या ऊस वाहतूक करणार्या बैलगाडीला दुचाकीची जोरदार धडक बसली. त्यात चैतन्य गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List