मुंबई इंडियन्सने रोखला दिल्ली कॅपिटल्सचा विजयरथ, 12 धावांनी जिंकला सामना

मुंबई इंडियन्सने रोखला दिल्ली कॅपिटल्सचा विजयरथ, 12 धावांनी जिंकला सामना

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव केला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 205 धावा केल्या. प्रत्युत्तरात संपूर्ण दिल्ली संघ फक्त 193 धावा करू शकला. आयपीएल 2025 मध्ये दिल्लीचा हा पहिला पराभव आहे. याआधी त्यांनी सलग 4 विजय मिळवले होते. दुसरीकडे जर मुंबईने हा सामना गमावला असता, तर त्यांचा प्लेऑफचा मार्ग कठीण झाला असता.

दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार अक्षर पटेल यांनी मैदानाच्या परिस्थितीचा अंदाज घेत हा निर्णय घेतला, पण मुंबईच्या फलंदाजांनी त्यांना चांगलेच झुंजवले. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 205 धाव केल्या . तिलक वर्माने 33 चेंडूत 59 धावांची आक्रमक खेळी केली, तर रायन रिकल्टनने 41 धावा, सूर्यकुमार यादवने 40 धावा आणि नमन धीरने नाबाद 38 धावा काढत मुंबईला भक्कम धावसंख्या मिळवून दिली. दिल्लीच्या गोलंदाजांपैकी कुलदीप यादवने 4 षटकांत 23 धावांत 2 बळी घेतले, तर विप्रज निगमनेही 2 बळी घेतले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी ! वाल्मिक कराडला काम संपल्यावर मारण्याचा प्लान?; संजय राऊत यांच्या विधानाने खळबळ मोठी बातमी ! वाल्मिक कराडला काम संपल्यावर मारण्याचा प्लान?; संजय राऊत यांच्या विधानाने खळबळ
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड सध्या तुरूंगात कैद आहे. कराड आणि त्याच्या गँगचे अनेक...
लाडक्या बहीण योजनेबाबत संजय राऊत यांचा दावा काय? राऊत म्हणाले, आता नवा वाद…
गोविंदाला घटस्फोट देण्याबद्दल पत्नी सुनिताची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाली, “तू जरा जास्तच..”
Divyanka Tripathi Divorce Rumoures : टीव्हीच्या आणखी एका सुनेचा संसार मोडणार ? दिव्यांका त्रिपाठीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण
म्हातारपण दिसून येतंय.. म्हणणाऱ्यांना सलमान खानने असं दिलं उत्तर; ट्रोलर्सची बोलतीच बंद
‘अखेरच्या श्वासापर्यंत तिच्यासाठी भांडेन..’; ऐश्वर्याबद्दल ‘ती’ बातमी देणाऱ्यांना अमिताभ बच्चन यांनी सुनावलं
‘लाज वाटली पाहिजे त्या लोकांना…’, Nisha Rawal ने ट्रोल करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर, व्हिडीओमुळे वाद