आता विद्यार्थ्यांच्या मागेही ED, CBI, IT चौकशीचा ससेमिरा लावतात की काय? गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ विधानावरून रोहित पवारांचा सवाल

आता विद्यार्थ्यांच्या मागेही ED, CBI, IT चौकशीचा ससेमिरा लावतात की काय? गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ विधानावरून रोहित पवारांचा सवाल

जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक शाळा पुरेशा पटसंख्येअभावी बंद पडायची वेळ आली आहे. अशा स्थितीत शिक्षकांनी नुसते हातावर हात ठेऊन बसू नये, तर आम्ही राजकारणी जसे पक्ष फोडतो तसे तुम्हीही इंग्रजी माध्यमातील पोरं फोडा, असा अजब सल्ला मिंधे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांना दिला. याचा व्हिडीओही व्हायरल झाला असून विरोधकांनी गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही यावरून गुलबाराव पाटील यांच्यावर टीका केली आहे. ईडी, सीबीआय, आयटी चौकशीचा ससेमिरा लावून जसे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि महाविकास आघाडीचे सरकार पाडले, तशा चौकशीचा ससेमिरा विद्यार्थ्यांच्या मागे लावणार का, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

आता विद्यार्थी फुटले नाही तर त्यांच्यामागेही मंत्री महोदय सक्तवसुली संचालनालय, केंद्रीय अन्वेषन ब्युरो, आयकर विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लावतात की काय, याची भीती वाटतेय. मंत्री महोदय, विद्यार्थी फोडाफोडीपेक्षा सरकारी शाळांमध्ये पुरेशा सुविधा आणि शिक्षकांच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारा. शाळांसमोर विद्यार्थ्यांच्या रांगा लागतील, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘आधी पटवलं मग केलं लग्न…’, शिंदेंच्या कोकणातील शिलेदाराची अनोखी लव्हस्टोरी, काय सांगितला अफलातून किस्सा? ‘आधी पटवलं मग केलं लग्न…’, शिंदेंच्या कोकणातील शिलेदाराची अनोखी लव्हस्टोरी, काय सांगितला अफलातून किस्सा?
कोकणातील एकनाथ शिंदे गटाचे मातब्बर नेते भरतशेठ गोगावले हे त्यांच्या बेधडक स्वभावामुळे ओळखल्या जातात. कोकणी माणसासारखे ते वरवर कडक वाटत...
लाडकी बहीण योजनेत आठ लाख महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 रुपये मिळणार
सूर्यदेव कोपला, मुंबईत घामाच्या धारा, अनेक जिल्ह्यात पार वाढला, काम असेल तरच बाहेर पडा
मुस्लिम या देशात कायद्यात राहिले तर फायद्यात…धीरेंद्र शास्त्री महाराज नेमके काय म्हणाले?
‘नेहरूंकडून आंबेडकरांचा अपमान, तर मोदींकडून देवतुल्य स्थान’; बाबासाहेबांच्या जयंतीदिनी कंगना यांचं मोठं वक्तव्य
लॉरेन्स बिष्णोईनंतर सलमानचा नवीन दुश्मन कोण? ‘पांड्या’ने का पाठवला धमकीचा मेसेज?
घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलचं ब्रेकअप? व्हिडीओ पोस्ट करत ‘ती’ म्हणाली, ‘जा तुला माफ…’