सलमान खानने सरळ हात जोडले अन्… म्हणाला ,’मी खूप वादांमधून गेलोय पण आता….”

सलमान खानने सरळ हात जोडले अन्… म्हणाला ,’मी खूप वादांमधून गेलोय पण आता….”

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे सलमान खान हा बॉलिवूडमधला सर्वांचा आवडता अभिनेता आहे. त्याच्याबद्दल नक्कीच कोणत्या ओळखीची आवश्यकता नाही. सलमान खान हा बॉलिवूडमधील अशा कलाकारांपैकी एक आहे ज्यांने अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तो त्याच्या शैलीने चाहत्यांना प्रभावित करत असतो. पण सोबतच सलमानचे बऱ्याच वादांशी नावही जोडले जाते. सध्या सलमान खान त्याच्या ‘सिकंदर’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, त्याने सर्वांन म्हटलं की तो आधीच बऱ्याच कॉंट्रोवर्सीमध्ये अडकला आहे आता नवा वाद नको. पण तो असं का म्हणाला? चला जाणून घेऊयात.

सलमान खान कोणत्या वादांमुळे चर्चेत होता 

सलमान खान अनेक वादामुळे आधीच बऱ्याचदा चर्चेत राहीला आहे. मग तो राजस्थानमधील चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काळवीट शिकार असो, रोडरेज प्रकरण असो, ऐश्वर्या रायसोबतचा वाद असो किंवा विवेक ओबेरॉयला धमकी दिल्याचा आरोप असो, गायक अरिजीत सिंगसोबतचे शीतयुद्ध असो, शाहरुख खानसोबतचे त्याचे भांडण, असे अनेक वाद आहेत ज्यात सलमानचे नाव गुंतलेले आहे. पण या कठीण काळातही चाहत्यांनी नेहमीच सलमान खानला पाठिंबा दिला.

“मी आधीच खूप वादांमधून गेलो आहे…”

‘टायगर ३’ नंतर आता सर्वांना उत्सुकता होती ती सलमान खानच्या ‘सिकंदर’ची आहेत. पण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सलमान खानने कोणत्याही नव्या वादात न सापडण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. माध्यमांशी बोलताना सलमान खानने चित्रपटापाच्या कॉंट्रोवर्सीबद्दल बोलला आणि हात जोडून म्हणाला – ‘अरे नाही… मला आता कोणताही वाद नको आहे… मी आधीच खूप वादांमधून गेलो आहे आणि आता मला वाटत नाही की कॉंट्रोवर्सीमुळे चित्रपट हिट होतो. शुक्रवारी रिलीज होणारा चित्रपट पुढील मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. चित्रपट प्रदर्शित होऊ द्या पण कॉंट्रोवर्सी होऊ देऊ नका असही सलमान खानने म्हटलं आहे.


सलमान खानने त्याच्या कुटुंबाबद्दल काय म्हटले?

सलमान खान पुढे म्हणाला, ‘आम्ही खूप काही पाहिले आहे आणि आता आमच्याकडे पाहण्यासाठी काहीही नाही. आम्हाला फक्त एवढेच हवे आहे की कुटुंबाने कोणत्याही वादविवादाविना आयुष्य जगावं… हीच आमची आता एकमेव इच्छा आहे.” चित्रपटाबाबत सलमान पुढे म्हणाला, ‘तुम्ही चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की ट्रेलर काहीच नव्हता कारण ट्रेलरमध्ये बऱ्याच गोष्टी दाखवता येत नाहीत. या चित्रपटात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खूप आवडतील”

जोपर्यंत आयुष्य आहे, तोपर्यंत…

सलमान खानने ‘सिकंदर’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून आलेल्या धमकीच्या प्रश्नावर देखील उत्तर दिले. तो म्हणाला ‘देव आणि अल्लाह आपल्यासोबत आहेत, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण जगू…’

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आधी सिलेंडर फुटला, मग फटाक्यांचा स्फोट; 7 जणांचा मृत्यू; काही जण जखमी आधी सिलेंडर फुटला, मग फटाक्यांचा स्फोट; 7 जणांचा मृत्यू; काही जण जखमी
सिलेंडर फुटल्याने घरातील फटाक्यांचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीत सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण जखमी...
Aircraft Crashes In Gujarat – गुजरातमध्ये खाजगी विमान कोसळलं, महिला प्रशिक्षणार्थी पायलट जखमी
MI vs KKR – मुंबईने उघडलं विजयाचं खातं, कोलकात्याचा 8 विकेट्सने केला पराभव
भाजपच्या जागा वाढवण्यासाठी मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा घाट? जाणून घ्या का होतोय दक्षिणेकडीस राज्यातून विरोध
Night landing at Shirdi Airport : साई भक्तांसाठी आनंदाची बातमी, काकड आरतीला पोहचणे झाले सोपे, शिर्डी एअरपोर्टवर नाईट लॅडींगची सुविधा
‘तेव्हा मशिनमध्ये गडबड नव्हती अन् आता…’, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून राम शिंदेंचा उत्तम जानकरांना खोचक टोला
सलमान खानने बुलेटप्रूफ काचेतून चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा