गुंतवणूकदारांचे 6.40 लाख कोटी स्वाहा

गुंतवणूकदारांचे 6.40 लाख कोटी स्वाहा

आठवडय़ाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 728 अंकांनी घसरून 77,288 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 181 अंकांनी घसरून 23,486 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारात घसरण झाल्यामुळे अवघ्या दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे 6.40 लाख कोटी रुपये पाण्यात बुडाले आहेत.

मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टी किरकोळ वाढीसोबत बंद झाले होते, परंतु तरीही गुंतवणूकदारांना 3.34 लाख कोटींहून अधिक नुकसान सोसावे लागले होते, तर बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये एक टक्क्याची घसरण पाहायला मिळाली. यामुळे गुंतवणूकदारांना 3 लाख कोटींहून अधिक तोटा सहन करावा लागला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संभावित अमेरिकन टॅरिफमुळे गुंतवणूकदार अलर्ट झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज ठाकरेंची तोफ धडाडणार; पाडवा मेळाव्यानिमित्त मुंबईच्या वाहतुकीत बदल, कोणते मार्ग राहणार बंद? राज ठाकरेंची तोफ धडाडणार; पाडवा मेळाव्यानिमित्त मुंबईच्या वाहतुकीत बदल, कोणते मार्ग राहणार बंद?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये सभा आयोजित केली आहे. ही सभा...
प्रचंड ग्लॅमरस आहे राधे माँची सून, फिटनेस आणि अध्यात्म दोन्हीमध्ये सक्रिय
Sikandar Review: पुन्हा एक फ्लॉप सिनेमा… काय आहे सलमान खानच्या ‘सिंकदर’ची कथा? वाचा रिव्ह्यू
Sikandar Leaked: सलमान खानच्या ‘सिकंदर’ला मोठा फटका; एचडीमध्ये चित्रपट लीक
… तर अजित पवारांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे – संजय राऊत
मोदींचा स्वभाव पाहता ते फक्त सत्तेसाठीच एखाद्याशी जुळवून घेऊ शकतात, संजय राऊत यांची टीका
राज ठाकरेंना कळकळीचं आवाहन, तर अजितदादांकडे राजीनाम्याची मागणी; संजय राऊत यांची टोलेबाजी काय?