…तेव्हा तुम्ही बाळासाहेबांचा अपमान नाही केलात का? जया बच्चन यांची मिंधे गटाला चपराक

…तेव्हा तुम्ही बाळासाहेबांचा अपमान नाही केलात का? जया बच्चन यांची मिंधे गटाला चपराक

स्टँडअप कॉमेडियन कुणाला कामरा याने केलेले विडंबन गीत मिंधे गटाला चांगलेच झोंबले आणि त्यांच्या नेते व कार्यकर्त्यांनी संबंधित स्टुडिओची तोडफोड केली. यावरून आता राज्यासह देशभरातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आमच्या नेत्याचा अपमान झाला असा थयथयाट करणाऱ्या मिंधे गटाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी दिली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करत जया बच्चन यांनी मिंधे गटाला चपराक दिली. ‘तुमच्या नेत्याचा अपमान झाला म्हणता, मग तुम्ही तुमचा मूळ पक्षसोडून दुसऱ्यांसोबत गेला तो बाळासाहेबांचा अपमान नाही का?’, असा बोचरा सवाल जया बच्चन यांनी केला आहे.

मीडियासोबत बोलताना कुणाल कामराच्या घटनेसंदर्भात विचारताच ‘तुम्ही सगळे मीडिया प्रतिनिधी आहात. तुम्हीच बोललं पाहिजे. अशा प्रकारे जर बोलण्यावर बंदी आली तर तुमचं काय होईल? अशीही तुमची स्थिती अत्यंत खराब आहे. तुमच्यावर अनेक बंधनं आहेत. आता तुम्हालाही सांगतील की असंच बोला आणि तसंच बोला, हे बोलू नका. जया बच्चन यांची मुलाखत घेऊ नका’, असं जया बच्चन म्हणाल्या.

‘बोलण्याचं स्वातंत्र्य आहेच कुठे?’, असा प्रश्न करत ‘मारामारी करा, विरोधकांना मारा, महिलांवर बलात्कार करा, त्यांना लटकवा, त्यांचा जीव घ्या, अशा कृतीचं फक्त स्वातंत्र्य आहे’, अशा शब्दात त्यांनी आपला संतापही व्यक्त केला.

एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि कार्यकर्ते हे त्यांच्या नेत्याचा अपमान झाल्याचा दावा करत असल्याचे मीडिया प्रतिनिधीने म्हणताच ‘सत्तेसाठी तुम्ही तुमचा मूळ पक्ष सोडून दुसऱ्या पक्षासोबत गेलात, आपणच मूळ पक्ष असल्याचा दावा केला हा अपमान नाही झाला का? हा बाळासाहेबांचा अपमान नाही का?’, असा झणझणीत सवाल जया बच्चन यांनी केला. व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्र होरपळला, उष्माघाताचा पहिला बळी, धरणातील जलसाठा झाला कमी महाराष्ट्र होरपळला, उष्माघाताचा पहिला बळी, धरणातील जलसाठा झाला कमी
होळी संपल्यानंतर उन्हाचा पारा वाढला आहे. महाराष्ट्र होरपळला आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. जणू राज्यावर सूर्य देव कोपला...
‘डाळ पुरावी म्हणून जास्त पाणी घालायचो…’ शाहरुख खानने सांगितला तो बालपणीचा संघर्ष
“मला अशी पत्नी नको जी..”; अमिताभ बच्चन यांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट, जया यांच्याकडून खुलासा
मुस्लीम पत्नीसाठी हिंदू अभिनेता करतोय रोजा; इस्लामबद्दल म्हणाला “खूप कठीण..”
Katrina Kaif- कतरिना कैफ का गेली पाकिस्तानला? वाचा सविस्तर
आयाराम गयाराम… कोर्टाने हस्तक्षेप केला नाही तर ते 10व्या अनुसूचीची थट्टा ठरेल! महाराष्ट्रातील राजकारणावर SC ची महत्त्वाची टिप्पणी
स्तन दाबने बलात्कार नाही, ‘या’ निर्णयावरून सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्तींना झापले; म्हणाले अत्यंत असंवेदनशील आणि…