Deepika Padukone- ऑस्कर पुरस्कारांमध्ये हिंदुस्थानातील चित्रपटांवर कायम अन्याय झाला आहे! – दीपिका पादुकोण

Deepika Padukone- ऑस्कर पुरस्कारांमध्ये हिंदुस्थानातील चित्रपटांवर कायम अन्याय झाला आहे! – दीपिका पादुकोण

सध्याच्या घडीला बाॅलिवूड कलाकारांकडून ऑस्कर पुरस्कारांबद्दल उघडपणे रोष व्यक्त होताना दिसत आहे. यातच आता दीपिकानेही ऑस्कर पुरस्कारांबद्दल उघडपणे रोष व्यक्त केला आहे. दीपिकाच्या मते, जे हिंदुस्थानी चित्रपट ऑस्करला पात्र होते, त्यांना मात्र पहिल्याच फेरीतून बाद व्हावे लागले होते. यामध्ये तिने ‘लापता लेडिज’ या चित्रपटाचा उल्लेख केला आहे. ऑस्कर पुरस्कारांबद्दल वेळोवेळी बाॅलिवूडच्या कलाकारांनी आपले मत व्यक्त केलेले आहे. अनेकदा चांगल्या चित्रपटांवर झालेल्या अन्यायामुळे कित्येक चित्रपट ऑस्कर पहिल्या फेरीपर्यंत सुद्धा पोहोचले नाही.

 

 

दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये, अभिनेत्री लुई व्हिटॉन शोसाठी तयारी करताना दिसत आहे. या ब्रँडने अॅम्बेसेडर म्हणून निवडलेली दीपिका ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे. व्हिडिओमध्ये, दीपिका तयारी करताना बोलत आहे. यावेळी, ती ऑस्कर पुरस्कारांवर रोष व्यक्त करताना दिसली आहे. ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नातू नातू’ या गाण्याला ऑस्कर मिळाला तो क्षणही २०२३ चा क्षण आठवण दीपिका यावेळी चांगलीच भावनिक झाली होती.

व्हिडिओमध्ये पुढे दीपिका स्पष्टपणे म्हणाली की ऑस्कर पुरस्कारांसाठी अनेक भारतीय चित्रपटांची योग्य ती दखल घेतली नाही. मनातील वेदनेला वाट करत ती म्हणाली, “भारताकडून ऑस्कर पुरस्कार अनेक वेळा हिसकावून घेण्यात आला. असे अनेक चित्रपट होते जे पुरस्कारासाठी पात्र होते. पण त्यांना मात्र पहिल्याही फेरीत स्थान मिळाले नाही.”

व्हिडिओच्या अगदी सुरुवातीला, दीपिका पदुकोणने अभिनेता एड्रियन ब्रॉडीला ऑस्कर मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. एड्रियन ब्रॉडीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यावर तिला खूप आनंद झाला होता. ‘द ब्रुटालिस्ट’ चित्रपटासाठी एड्रियनला ऑस्कर देण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्र होरपळला, उष्माघाताचा पहिला बळी, धरणातील जलसाठा झाला कमी महाराष्ट्र होरपळला, उष्माघाताचा पहिला बळी, धरणातील जलसाठा झाला कमी
होळी संपल्यानंतर उन्हाचा पारा वाढला आहे. महाराष्ट्र होरपळला आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. जणू राज्यावर सूर्य देव कोपला...
‘डाळ पुरावी म्हणून जास्त पाणी घालायचो…’ शाहरुख खानने सांगितला तो बालपणीचा संघर्ष
“मला अशी पत्नी नको जी..”; अमिताभ बच्चन यांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट, जया यांच्याकडून खुलासा
मुस्लीम पत्नीसाठी हिंदू अभिनेता करतोय रोजा; इस्लामबद्दल म्हणाला “खूप कठीण..”
Katrina Kaif- कतरिना कैफ का गेली पाकिस्तानला? वाचा सविस्तर
आयाराम गयाराम… कोर्टाने हस्तक्षेप केला नाही तर ते 10व्या अनुसूचीची थट्टा ठरेल! महाराष्ट्रातील राजकारणावर SC ची महत्त्वाची टिप्पणी
स्तन दाबने बलात्कार नाही, ‘या’ निर्णयावरून सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्तींना झापले; म्हणाले अत्यंत असंवेदनशील आणि…