ज्यांनी महाराष्ट्र गुजराती व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न केला त्यांना संधी मिळाली तरी भेटणार नाही, संजय राऊत यांनी सुनावले

ज्यांनी महाराष्ट्र गुजराती व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न केला त्यांना संधी मिळाली तरी भेटणार नाही, संजय राऊत यांनी सुनावले

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नुकतीच भेट झाली होती. या भेटीत तब्बल 15 मिनिटे त्यांच्यात चर्चा झाली. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी थेट, ज्यांनी महाराष्ट्र गुजराती व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न केला त्यांना संधी मिळाली तरी भेटणार नाही, असे कडक शब्दात सुनावले आहे.

”जी लोकं आम्हाला सोडून गेले आम्ही त्यांच्या वाऱ्यालाही फिरकत नाही. ज्या प्रकारे त्यांनी बेईमानी केली, गद्दारी केली, महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांच्या आसपाससुद्धा जात नाही. यांचं बरं असतं यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असतं, विद्या प्रतिष्ठान असतं. या सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते, आमच्याकडे असं काही नाही. त्यामुळे आमच्या भेटी गाठी कुणाशी होत नाही आणि होण्याची वेळ आली तरी आम्ही टाळतो. राजकारणात संवाद ठेवला पाहिजे अशा दांभिक गोष्टींवर आमचा विश्वास नाही. ज्यांनी आमचा पक्ष फोडला, ज्याने महाराष्ट्राशी बेईमानी केली, महाराष्ट्र गुजराती व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी महाराष्ट्राच्या शत्रुपुढे गुडघे टेकले त्यांना कितीही संधी असली तरी भेटणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी ”आम्ही फाटकी माणसं आहोत रस्त्यावरची. आमच्याकडे संस्था वगैरे नाही. आम्ही भांडत राहू, लढत राहू व धडा शिकवू, असे देखील म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर
कंपन्यांनी खर्च कमी करण्याच्या नावाखाली गेल्या तीन वर्षांत जवळपास 5.8 लाख कर्मचाऱ्यांना कामांवरून काढून टाकले आहे. 2023 मध्ये कंपन्यांनी 2...
हे कोर्टरूम आहे, सिनेमा हॉल नाही! सुनावणीसाठी थेट शौचालयातून उपस्थित राहणाऱ्या आरोपीला कोर्टाने झापले 
वैष्णोदेवी दर्शनासाठी आता थेट फ्लाईट
हिंदुस्थान-फ्रान्स नौदलाचा अभ्यास
धक्कादायक! ओडिशात रोज 3 बालविवाह
नौदलात 29 मार्चपासून अग्निवीर पदांची भरती
कुवेतमध्ये 42 हजार जणांचे नागरिकत्व धोक्यात