Sindhudurg News – नवी मुंबईतून गोव्याला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला, दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

Sindhudurg News – नवी मुंबईतून गोव्याला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला, दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

नवी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने गंभीर अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार सूर्यकुमार पांडे याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीस्वाराच्या मागे बसलेला अंनिस शर्मा हा जखमी झाला. हा अपघात महामार्गावरील कासार्डे ब्राह्मणवाडी उड्डाणपुलावर शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा कंपनीत कामाला असणारे सूर्यकुमार पांडे व अंनिस शर्मा हे शुक्रवारी रात्री नवी मुंबईहून गोव्याला पर्यटनासाठी दुचाकीवरून जात होते. शनिवारी सकाळी महामार्गावरील कासार्डे ब्राह्मणवाडी येथील उड्डाणपुलाजवळ आले असता दुचाकीस्वार सूर्यकुमार पांडे याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी उड्डाणपुलासाईटला असलेल्या संरक्षक कठड्याला जावून आढळली. या धडकेत सूर्यकुमार पांडे याच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अंनिस शर्मा हा जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे, पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे यांनी मदतकार्य करत रुग्णवाहिकेतून जखमी अंनिस शर्मा याला कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तर सूर्यकुमार पांडे याचा मृतदेह शवागृहात ठेवण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यात आरोग्य सेवेतील गट – ‘ड’च्या 680 पदांची सरळसेवेने भरती, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र जारी राज्यात आरोग्य सेवेतील गट – ‘ड’च्या 680 पदांची सरळसेवेने भरती, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र जारी
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत तसेच आयुर्वेद महाविद्यालय यांच्यासह संलग्न एकूण ९ रुग्णालयातील गट ‘ड’ संवर्गातील 680 पदांची सरळसेवेने भरती...
देश डीजिटल पत्रकारितेकडे वळतोय, माध्यमं कधीच बंद होणार नाही; उमेश कुमावत यांचं प्रतिपादन
‘त्यांना संपवण्याची गरज नाही, ते आपल्या कर्मानेच संपले,’ उदय सामंत यांचा कोणाला टोला?
Central Railway: सेंट्रल रेल्वेसाठी गुड न्यूज, बदलापूर ते कर्जत रूटवर प्रवास सुखकर होणार, बदलापूर ते कर्जत मार्गासाठी सरकारचा निर्णय
दिशा सालियन प्रकरणात मोठी अपडेट; पोलीस वडिलांचा जबाब नोंदवण्याची शक्यता
IPL-2025 -CSK vs MI – चेन्नईसमोर मुंबईचे 156 धावांचं आव्हान; मुंबईचे फलंदाज ढेपाळले
Chhattisgarh Blast – बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांकडून एसटीएफच्या वाहनावर IED स्फोट, 2 जवान जखमी