समाजात दरी निर्माण करू नका; आपण ठरावीक गटाचे मंत्री नाहीत, तारतम्य ठेवून बोला! अजितदादांनी राणेंना सुनावलं

समाजात दरी निर्माण करू नका; आपण ठरावीक गटाचे मंत्री नाहीत, तारतम्य ठेवून बोला! अजितदादांनी राणेंना सुनावलं

औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्राचे वातावरण तापवण्याचे आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम सध्या सुरू आहे. महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे हे सातत्याने चिथावणीखोर विधाने करत असून एका विशिष्ट समाजाबद्दल टोकाचे बोलत आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परखड शब्दात भाष्य करत नितेश राणे यांना चांगलेच सुनावले आहे. समाजात दरी निर्माण करणे योग्य नसून आपण एका ठरावीक गटाचे मंत्री नाहीत, त्यामुळे तारतम्य ठेऊन बोला, असा घरचा आहेर अजित पवारांनी दिला. ते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

समाजामध्ये गैरसमज निर्माण करणे आणि दरी निर्माण करणे योग्य नाही. आपल्या विधानांमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडेल. पोलीस दलाला आधीच भरपूर काम असून त्यात हे नवीन काम त्यांच्या पाठीमागे लागेल, त्यामुळे असे करु नका. आपण एका पक्षाचे, गटाचे मंत्री नाहीत. आपल्यावर 13 कोटी जनतेची जबाबदारी आहे. त्यामुळे तारतम्य ठेवून बोलावे, असे अजित पवार म्हणाले.

आपण महापुरुषांचे नाव घेतो, त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आज आपल्याकडे अनेक जाती-धर्माची लोक आहेत. त्यामुळे कारण नसताना एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण करणे मला बरोबर वाटत नाही. कधीकाळी त्यांना तिथे दफन करण्यात आले. त्याला किती वर्ष झाली? इतक्या वर्षानंतर कशाला हे उकरून गाढायचे? असा सवालही त्यांनी केला.

मंत्रीपदावरील व्यक्तीने संयमाने बोलावे, मुख्यमंत्री फडणवीसांच्या नितेश राणेंना कानपिचक्या

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर
कंपन्यांनी खर्च कमी करण्याच्या नावाखाली गेल्या तीन वर्षांत जवळपास 5.8 लाख कर्मचाऱ्यांना कामांवरून काढून टाकले आहे. 2023 मध्ये कंपन्यांनी 2...
हे कोर्टरूम आहे, सिनेमा हॉल नाही! सुनावणीसाठी थेट शौचालयातून उपस्थित राहणाऱ्या आरोपीला कोर्टाने झापले 
वैष्णोदेवी दर्शनासाठी आता थेट फ्लाईट
हिंदुस्थान-फ्रान्स नौदलाचा अभ्यास
धक्कादायक! ओडिशात रोज 3 बालविवाह
नौदलात 29 मार्चपासून अग्निवीर पदांची भरती
कुवेतमध्ये 42 हजार जणांचे नागरिकत्व धोक्यात