छावा चित्रपट पाहिल्यानंतर..; नागपूर हिंसाचाराबद्दल देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

छावा चित्रपट पाहिल्यानंतर..; नागपूर हिंसाचाराबद्दल देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या आहेत… असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलं आहे. सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला आहे. नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला. दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. हिंसक झालेल्या जमावाने रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली. वाहनांना आगी लावल्या. याप्रकरणी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत जवळपास 50 जणांना घराघरातून ताब्यात घेतलं आहे.

नागपूर शहरात आज तणावपूर्ण शांतता आहे. यावर विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘छावा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या आहेत. राड्यात 33 पोलीस आणि 5 नागरिक जखमी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत घडलेल्या घटनेवर वक्तव्य केलं आहे. नागपुरात झालेल्या राड्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘कुणी दंगा करण्याचा प्रयत्न केला तर कारवाई केली जाईल पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही.. राड्यात काही ठराविक घरं आणि अस्थापनांना लक्ष करण्यात आलं आहे… असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.

विधनासभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे…

– हंसापुरी भागात दगडफेक झाली, तिथे अनेकांवर हल्ला करण्यात आला.

– भालदारपुरा भागातही राडा झाला आहे. पोलिसांवर देखील हल्ला करण्यात आला आहे.

– नागपुरात काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

– पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही… असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

नागपुरात झालेल्या राड्यानंतर 11 ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शांतता बाळगण्याच आवाहन केलं आहे. सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांनी राज्यभरात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावर आंदोलन केलं. नागपूरच्या महाल भागात अनियंत्रित जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यामध्ये पोलीस देखील जखमी झाले आहेत.

‘छावा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महारांजांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता अक्षय खन्ना याने औरंगजेबाच्या भूमिकेला न्याय दिला आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील बक्कळ कमाई केली. पण आता सिनेमामुळेच राज्यातील वातावरण तापलं आहे… असं अनेकांचं म्हणणं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यातील महापालिका निवडणुका कधी लागणार? मोठी अपडेट समोर राज्यातील महापालिका निवडणुका कधी लागणार? मोठी अपडेट समोर
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका पार पडल्या. विधानसभा निवडणुकांचा निकाल नोव्हेंबरमध्ये लागला होता. या निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणूक कधी लागणार...
महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यंटन स्थळावर पर्यटकांसाठी बंद, पर्यटनास जाण्यापूर्वी जाणून घ्या परिस्थिती
नवी मुंबई विमानतळामुळे प्रकल्पग्रस्तांना रोजगाराचे नवे दालन खुले, काय आहे योजना ?
सिडकोची मनमानी, नगरविकास मंत्र्यांचा आदेशही जुमानत नाही; अंबादास दानवेंनी उपस्थित केला खारघरच्या स्वप्नपूर्ती सोसायटीचा मुद्दा
सर्वसामान्यांच्या घराची होळी करायची त्यावर राजकारणाची पोळी भाजायची हे घृणास्पद आहे, उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारले
खळबळजनक! मोमोज बनवणाऱ्या कारखान्यावर वैद्यकीय पथकाचा छापा, फ्रीजमध्ये आढळले कुत्र्याचे डोके
Palm Rubbing- दोन्ही हाताचे पंजे एकमेकांवर घासल्याने, आरोग्यासाठी मिळतील खूप सारे फायदे