रिफायनरी बारसूलाच! सौदी आराम्कोशी वाटाघाटी सुरू, मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका

रिफायनरी बारसूलाच! सौदी आराम्कोशी वाटाघाटी सुरू, मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका

स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या तीव्र विरोधानंतर रत्नागिरीच्या बारसू येथे रिफायनरी प्रकल्प उभारण्याच्या हालचाली बंद होत्या. त्या हालचाली पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच रिफायनरी बारसूमध्येच होणार असे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री इतक्यावरच थांबलेले नाहीत, तर त्यांनी हा रिफायनरी प्रकल्प उभारणाऱया सौदी अराम्को या पंपनीबरोबर वाटाघाटीही सुरू केल्या आहेत. उच्चपदस्थांशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत स्थानिकांच्या माथी मारला जाणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

बारसू या गावात हा प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रस्तावित आहे; परंतु स्थानिक पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या प्रकल्पाविरोधात जोरदार लढा दिल्याने तो कुणालाही पुढे रेटता आला नाही. विरोध होऊ लागल्याने हा प्रकल्प उभारणाऱया सौदी अराम्को या कंपनीने समुद्रकिनारा असलेल्या गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांबरोबर बोलणी सुरू केली आहेत. मात्र हा प्रकल्प इतर कुठेही जाऊ न देता बारसूमध्येच उभारणार, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात एकच मोठा प्रकल्प उभारणे अवघड असल्याने महाराष्ट्रासह आंध्र किंवा केरळ किंवा अन्य राज्यांमध्ये तीन प्रकल्प सुरू करण्याचा राज्य व केंद्र सरकारचा विचार आहे. त्यासंदर्भात सौदी अराम्को कंपनीबरोबर बोलणीही सुरू आहेत, असेही फडणवीसांनी म्हटले आहे. बारसूच्या सडय़ावर जिथे प्रकल्पाची जागा ठरली आहे तेथील मातीची चाचणीही करण्यात आली होती. तिचा अहवाल सकारात्मक आला असून तिथे प्रकल्प उभारण्यात कोणतीही अडचण नसल्याचा दावाही फडणवीस यांनी केल्याचे कळते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

थोरले मुंडे असते तर धनंजय मुंडेंना चाबकाने फोडले असते, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने सुनावले, अजितदादांना केले हे आवाहन थोरले मुंडे असते तर धनंजय मुंडेंना चाबकाने फोडले असते, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने सुनावले, अजितदादांना केले हे आवाहन
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो, व्हिडिओ समोर आल्याने समाज हेलावले आहे. राज्यभरात संतापाची लाट उसळली...
धनंजय मुंडे राजीनामा द्या, आता सर्वोच्च आदेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह बड्या नेत्यांची चर्चा
‘त्याला मिशी-दाढी अन् तो चहा पिणारा…’; प्राजक्ता माळीचा होणारा नवरा असा असणार
‘छावा’मधून डिलिट केलेला लेझीम डान्स व्हायरल; नेटकरी म्हणाले “आमचं दुर्दैव..”
मोहम्मद सिराज ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री? रिलेशनशिपबद्दल अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
“ती आयटम जातच नाही..”; विवाहबाह्य संबंधाबद्दल गोविंदाच्या पत्नीचं वक्तव्य चर्चेत
‘छावा’ सिनेमाला मोठा फटका, 18 व्या दिवशी प्रेक्षकांनी फिरवली पाठ, कमाईचा आकडा इतक्या कोटींनी मंदावला