मराठी आलंच पाहिजे असं कुठे लिहिलंय, एअरटेलच्या मुजोर महिला कर्मचाऱ्याला शिवसेनेने शिकवला ‘धडा’

मराठी आलंच पाहिजे असं कुठे लिहिलंय, एअरटेलच्या मुजोर महिला कर्मचाऱ्याला शिवसेनेने शिकवला ‘धडा’

मराठी का आलं पाहिजे? असं कुठे लिहिलं आहे, असं उद्दामपणे विचारून महिलेने मराठीतून बोलण्यास नकार दिल्याची संतापजनक घटना कांदिवलीत घडली. एअरटेल गॅलरीत ही महिला काम करते. ‘मराठी येणं गरजेचं नाही,’ असे म्हणणाऱ्या या मुजोर महिलेला आणि एअरटेल प्रशासनला शिवसेनेने चांगलाच धडा शिकवला. महाराष्ट्रात ग्राहक कायम ठेवायचे असतील तर वेळीच पावलं उचला नाहीतर एअरटेलची गॅलरी दिसणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला.

गेल्या काही महिन्यांपासून मुजोर परप्रांतीयांकडून मराठी भाषेचा अवमान होण्याच्या घटना वाढल्या आहेत. चारकोपच्या एअरटेल गॅलरीत असाच प्रकार घडला. हिंदी भाषिक कर्मचारी महिलेने ग्राहकाशी मराठीत संवाद साधण्यास नकार देत उडवाउडवीची उत्तरे दिली. महाराष्ट्रात राहण्यासाठी मराठी आली पाहिजे असे कुठे लिहिले आहे? मला मराठी समजत नाही. त्यामुळे मी हिंदीतच बोलेन. इथे मराठी महत्त्वाची आहे असे मला वाटत नाही, असे म्हणत महिलेने ग्राहकाशी वाद घातला.

मुंबईत एकही गॅलरी दिसणार नाही

या घटनेनंतर शिवसेनेने एअरटेलवर धडक दिली. ‘एअरटेल प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचं महत्त्व समजावून सांगावे, असा इशारा शिवसेनेने दिला. महाराष्ट्रात एअरटेलचे मराठी ग्राहक कायम ठेवायचे असतील तर योग्य पावले उचला नाहीतर मुंबईत एअरटेलची गॅलरी दिसणार नाही. इतर भाषेचा विरोध नाही, पण मराठी भाषिक 80 टक्के कर्मचारी असायलाच हवेत,’ असा इशारा शिवसेनेचे अखिल चित्रे यांनी दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

संतोष देशमुख हत्येतील सर्व आरोपींनी फाशी द्या, तोपर्यंत एकही सण साजरा न करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार,पाहा काय घडले ? संतोष देशमुख हत्येतील सर्व आरोपींनी फाशी द्या, तोपर्यंत एकही सण साजरा न करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार,पाहा काय घडले ?
    बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी दहा डिसेंबर रोजी अपहरणानंतर हत्या करण्यात आली होती. या निर्घृण हत्येनंतर
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधिशांसोबत कोणी साजरी केली होळी, अंजली दमानिया यांचा फोटो ट्विट करत खळबळजनक दावा
‘टोल टोल टनटनाटन…’, सदावर्तेंनी पुन्हा राज ठाकरेंना डिवचलं, काय दिला सल्ला?
वड्याचे तेल वांग्यावर निघालं आहे, काय म्हणाले खोक्याचे वकील ?
हे 6 जण आहेत देशातील सर्वात श्रीमंत कॉमेडियन्स, चौथ्याने केले 1 हजार चित्रपट
उन्हाळ्यात ‘या’ 3 पिठाच्या चपात्या बेस्ट, गव्हाच्या पोळीचा पडेल विसर
दुधी भोपळा की काकडी? उन्हाळ्यासाठी कशाचा रायता उत्तम? रेसिपी आणि फायदे जाणून घ्या