सर्वसामान्यांना दिलासा, रेडी रेकनरसाठी व्हॅल्यू झोन तयार करणार

सर्वसामान्यांना दिलासा, रेडी रेकनरसाठी व्हॅल्यू झोन तयार करणार

रेडी रेकनर दरासंदर्भात सध्या संपूर्ण राज्यात सर्वेक्षण सुरू आहे. एकाच परिसरात सर्वसामान्य आणि उच्चभ्रू लोकवस्ती असते. अशा वेळी त्या परिसरात घरांची खरेदी करताना सरसकट रेडी रेकनरचे दर लावले जातात. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो. त्यामुळे रेडी रेकनरसाठी व्हॅल्यू झोन तयार करण्यात येत असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असे ते म्हणाले.

मुंबईतील वेगवेगळ्या भागांमध्ये विविध प्रकारची संपत्ती असून, हाय-राईज इमारती, एसआरए प्रकल्प आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजना यांच्यात मोठा फरक आहे. त्यामुळे प्रत्येक भागासाठी स्वतंत्र ’व्हॅल्यू झोन’ ठरवले जातात. रेडी रेकनर दर ठरविताना गरीब आणि मध्यमवर्गीयांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. रेडी रेकनरच्या दरात सरकार 10 ते 12 टक्के वाढ करणार असल्याची चर्चा निराधार असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

विधान परिषद सदस्य सुनील शिंदे, अॅड. अनिल परब, सचिन अहिर यांनी मालमत्तांच्या खरेदी-विक्रीवेळी जमा होणाऱ्या मुद्रांक शुल्कसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी! बदलापूरमध्ये उल्हास नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू मोठी बातमी! बदलापूरमध्ये उल्हास नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू
आज सर्वत्र होळीचा उत्साह आहे, आनंदाचं वातावरण आहे. मात्र अशा या वातावरणाला गालबोट लावणारी घटना बदलापूरमधून समोर आली आहे. अंगाला...
‘राज ठाकरे भांग पिऊन बोलतात’; भाजप नेत्यानं उधळले रंग
World Sleep Day: चांगली झोप हवी असेल तर हे काम कराच, आजारी लोकांना देखील मिळेल आराम
Another Round… Another Round! मद्यधुंद तरुणाने अनेकांना उडवलं, एका महिलेचा मृत्यू
राज्यात महिला अत्याचार आणि जनरल क्राईमचे प्रमाण वाढले – सुप्रिया सुळे
चीन बॉर्डरवर अरुणाचलमध्ये रस्ता बनविताना सैन्यदलाच्या वाहनाचा अपघात, कोल्हापूरच्या जवानाला वीरमरण
2100 कोटींचा निधी रोखला, मोदी सरकार आर्थिक भेदभाव करत आहे; स्टॅलिन सरकारचा आरोप