चार गावांतील ग्रामस्थांच्या संतापानंतर बीएनसी कंपनीला चाप, ‘दाबून’ ठेवलेले गावबंदीचे पत्र ग्रामपंचायतीने कंत्राटदाराला चिटकवले

शेतकऱ्यांच्या संतापानंतर नागोठण्याच्या पळस ग्रामपंचायतीने जेएसडब्ल्यू कंपनीच्या हायटेन्शन लाईनचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला गावबंदी करण्याचा निर्णय घेतला. तसे पत्रदेखील तत्काळ तयार करण्यात आले. मात्र तीन दिवस उलटले तरी हे पत्र ग्रामपंचायतीच्या दप्तरात धूळ खात पडले होते. याबाबत गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत अनेक सवाल उठवले. त्यानंतर आज सरपंचांसह अन्य सदस्यांनी हे पत्र कंत्राटदाराच्या हाती चिटकवले आहे. ‘दाबून’ ठेवलेले हे पत्र अखेर बाहेर निघाल्याने मुजोर कंत्राटदार राजेश चौधरी याला चाप लागेल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

… तोपर्यंत काम बंद राहील

ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया डाकी, उपसरपंच चंद्रकांत भालेकर, निष्ठा विचारे, किसान बोरकर, सतीश डाकी, पपू वाघमारे, परीक्षा घासे, सुरेखा नाईक, उषा साळुंखे यांनी आज बीएनसी कंपनीचे ठेकेदार रामण्णा यांची भेट घेत त्यांना ग्रामपंचायतीचे पत्र दिले. कंपनीने गावकऱ्यांबरोबर संयुक्त बैठक घेऊन शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा. तोपर्यंत कोणतेही काम करू नये असे ग्रामपंचायतीने कंत्राटदाराला सांगितल्याचे उपसरपंच चंद्रकांत भालेकर यांनी सांगितले.

टीकेची उठली झोड

जेएसडब्ल्यू कंपनीच्या हायटेन्शन लाईनविरोधात पळस ग्रामपंचायतीत पळस, बाहेरशीव, वागळी, शेतपळस येथील गावकऱ्यांची तीन दिवसांपूर्वी बैठक झाली होती. यावेळी हायटेन्शन लाईनचे रेटण्यात येत असलेले काम आणि बाहेरशीव येथील महिलांना बीएनसी कंपनीचा अधिकारी राजेश चौधरी व राम घरत यांनी मातीत गाडण्याची दिलेल्या धमकीवरून तीव्र संताप व्यक्त करत हे काम तत्काळ थांबवण्याची मागणी नागरिकांनी केली. याची दखल घेत ग्रामपंचायतीने बीएन्सी कंपनीला काम करण्यास्य महाव करण्याचा तयार करण्यात आले. मात्र तीन दिवस उलटले तरी हे पत्र कंत्राटदाराला देण्यात आले नव्हते. याबाबत गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत ग्रामपंचायतीवर टीकेची झोड उठवली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

संत तुकाराम महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचे अनावरण संत तुकाराम महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचे अनावरण
संत तुकाराम महाराजांच्या 375व्या बीज सोहळ्यानिमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (दि. 11)...
कोल्हापुरातील ‘कुष्ठधाम’च्या वास्तूला आग
धक्कादायक… बांगलादेशींकडे हिंदुस्थानचे जन्म दाखले, हायकोर्टाने घेतली गंभीर दखल; बोगस कागदपत्रांच्या आधारे घेताहेत मतदान कार्ड
शिंदेंच्या आनंदाचा शिधा संपला! फडणवीसांचं ठरलंय… शिंदेंच्या योजना एकामागून एक गुंडाळण्याचा धडाका
गोरेंविरोधात तक्रार करणाऱ्या पीडित महिलेला पुन्हा धमक्या, तुषार खरातसारखे तुझेही हाल करू
लोकल ट्रेनवर फुगे फेकणाऱ्यांची खैर नाही! पोलिसांची करडी नजर; रेल्वे प्रशासन दंडात्मक कारवाई करणार
राज्यात तीन वर्षांत रस्ते अपघातांत 46 हजार जणांचा मृत्यू, ड्रग्ज सेवनाची चाचणी करण्यासाठी उपकरणे