सरकारने शेतकऱ्यांचे भात घेतले, पैसे लटकवले,दोन महिने उलटले एक पैसाही दिला नाही; आदिवासी विकास महामंडळाचा तुघलकी कारभार

सरकारने शेतकऱ्यांचे भात घेतले, पैसे लटकवले,दोन महिने उलटले एक पैसाही दिला नाही; आदिवासी विकास महामंडळाचा तुघलकी कारभार

भात खरेदी केंद्रावर भात देऊन दोन महिने उलटले असले तरी वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. सोसायटीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड रखडली आहे. आदिवासी विकास महामंडळ आणि सरकारच्या या तुघलकी कारभाराविरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळाकडून तालुक्यात भात खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यात गोहे, पोशेरी, कोनसई, परळी, सारशी, खैरे- आंबिवली, मानिवली, गुहिर या आठ केंद्रांचा समावेश आहे. यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी केलेली आहे. अशा शेतकऱ्यांचे भात खरेदी-विक्री केंद्रांवर घेण्यात आले आहेत. ज्यांच्या नोंदी झालेल्या नाहीत त्यांचे भात घेतलेले नाही. भात विक्री होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिकचा काळ लोटला आहे तरी भात विक्रीचे पैसे दिलेले नाहीत. भाताचे पैसे लवकर मिळावेत यासाठी अनेक शेतकरी महामंडळाच्या कार्यालयात दररोज फेऱ्या मारीत आहेत. अधिकारी मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन पुन्हा माघारी पाठवत आहेत.

■ तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे करोडोंच्या घरात शेतकऱ्यांचे पैसे अडकल्याने येथील शेतकरी संकटात सापडले आहेत. सेवा सहकारी सोसाट्यांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
■ सध्या लग्नसराई सुरू आहे. मुलाबाळांची लग्नं येऊ घातली आहेत. ही लग्नं उरकणार कशी, असा मोठा आर्थिक पेच त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
■ केंद्रचालकांकडे यासंदर्भात चौकशी केली असता काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे थांबवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सर्वच कागदपत्रांची खातरजमा करून घेतली असता तांत्रिक अडचण तरी कोणती, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
■ लवकरात लवकर भात विक्रीचे पैसे मिळाले नाहीत तर तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी मात्र सध्या फक्त उडवाउडवीच्या उत्तरात व्यस्त आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ladki Bahin Yojana : वेड्या बहिणीची वेडी ही माया, राज्य सरकार मालामाल, हक्कसोड चळवळीने तिजोरीत आला पैसाच पैसा Ladki Bahin Yojana : वेड्या बहिणीची वेडी ही माया, राज्य सरकार मालामाल, हक्कसोड चळवळीने तिजोरीत आला पैसाच पैसा
लाडक्या बहि‍णींनी राज्य सरकारला मालामाल केले. विधानसभा निवडणुकीनंतर सरकारच्या तिजोरीवर ताण आला. भावाच्या खिशावर ताण आल्याचे लक्षात येताच बहिणीचा जीव...
‘छावा’ची स्क्रीप्ट ऐकताच विकी कौशल भावूक झाला, हात जोडून म्हणाला…; लेखकाचा मोठा खुलासा
‘छावा’ पाहिल्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांची मनाला भिडणारी पोस्ट; ‘हाथी घोडे, तोफ तलवारे..’
रजनीकांत श्रीदेवीच्या प्रेमात अखंड बुडाले होते; ते प्रपोज करणार तेवढ्यात लाईट गेली अन् सगळंच फिसकटलं,काय आहे तो किस्सा
नवरा म्हणाला, तुझे ड्रायव्हरसोबत संबंध म्हणून…, मुलीच्या जन्मानंतर नवऱ्याने सोडली अभिनेत्रीची साथ
त्र्यंबकेश्वर मंदिरात होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाविरोधात पुरातत्त्व विभागाचा इशारा
१४ तास बेशुद्ध, बीपी लो… बिग बींना केले होते मृत घोषित, वाचा नेमकं काय झालं होतं?