पुण्यानंतर मुंबईत भयानक घटना, 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, 24 ते 27 फेब्रुवारी दरम्यानचा घटनाक्रम थक्क करणारा

पुण्यानंतर मुंबईत भयानक घटना, 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, 24 ते 27 फेब्रुवारी दरम्यानचा घटनाक्रम थक्क करणारा

Mumbai Jogeshwari Rape Case: विद्येचं माहेरघर पुण्यानंतर मुंबईत अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या 12 वर्षीय मुलीवर पाच जणांनी बलात्कार केलाय. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून पुढील चौकशी सुरु करण्यात आली आहे. 24 फेब्रुवारी रोजी घरातून गायब झालेली मुलगी 27 फेब्रुवारी रोजी पालिसांना भेटली. पण तोपर्यंत फार उशिर झाला होता. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी मुलीवर अत्याचार करण्यात आले. दादर रेल्वे स्थानक परिसरात आढलेल्या मुलीने पोलिसांना 24 ते 27 फेब्रुवारी दरम्यानचा घटनाक्रम सांगितला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मुंबईतील जोगेश्वरी येथे तिच्या नातेवाईकांसोबत राहत होती. 24 फेब्रुवारी रोजी मुलगी घरातून गायब झाली. पीडित मुलीच्या काकांनी 26 फेब्रुवारी रोजी जोगेश्वरी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र मुलगी सापडली नाही.

याच दरम्यान, मुलगी 27 फेब्रुवारी रोजी दादर रेल्वे स्थानकात एकटीच असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांना संशाय आला आणि त्यांनी मुलीची चौकशी केली. तेव्हा त्या 12 वर्षांच्या मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर दादर पोलिसांनी मुलीला जोगेश्वरी पोलिसांच्या ताब्यात दिलं.

तपासात मिळालेल्या माहितीनुसार, एका एसी मॅकेनिकने मुलीचं अपहण केलं. मुलीला एकटी पाहून आरोपींनी तिला जोगेश्वरीतील संजय नगर भागात असलेल्या त्याच्या घरी नेले. जिथे 26 फेब्रुवारीच्या रात्री तीन तरुणांनी तिच्यावर आळीपाळी बलात्कार केला. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी मुलीने तिघांच्या तावडीतून स्वतःची सुटका केली.

जोगेश्वरी येथून स्वतःची सुटका केल्यानंतर पीडित मुलगी घाटकोपरपर्यंत पोहोचली. त्यानंतर अन्य दोन पुरुषांनी तिली मदद करतो असं सांगत मरीन ड्राईव्ह आणि त्यानंतर दादर येथे घेऊन गेले. दोघांनी देखील मुलीवर अत्याचार केले. 24 ते 27 फेब्रुवारी दरम्यान मुलीसोबत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी पाचही आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरात भांडण झाल्यामुळे मुलगी घर सोडून गेली होती. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. 12 वर्षीय मुलीवर झालेल्या  घटनेनंतर महिलांसाठी सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबई शहरातही महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यात AI मुळे बेरोजगारी वाढू शकते, विधानपरिषदेत शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य राज्यात AI मुळे बेरोजगारी वाढू शकते, विधानपरिषदेत शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य
राज्यात एआयमुळे (AI) मुळे बेरोजगारी वाढू शकते, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषदेत व्यक्त...
परभणीतील सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार
धारावीची एक इंचही जागा अदानी यांना देणार नाही; शेलार यांनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
माझ्याशी नीट वागायचं… हॅशटॅग ठेवत सुषमा अंधारे यांचा कुणाला रोखठोक इशारा?
औरंगजेबाची कबर हटवा, उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या वतीने आयोजित ग्रामीण शिक्षक प्रशिक्षण वर्ग, 8 जिल्ह्यांमधील शिक्षकांचा सहभाग