अभिनेता कमाल खान बरळला, छत्रपती संभाजी महाराजांविषयी केले आक्षेपार्ह विधान

अभिनेता कमाल खान बरळला, छत्रपती संभाजी महाराजांविषयी केले आक्षेपार्ह विधान

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत ‘छावा’ चित्रपट चर्चेत असतानाच आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. विकिपिडीयावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त मजकुर पोस्ट करण्यात आला होता. हा वादग्रस्त मजकुर आता नव्या वादाचे कारण झालेला आहे. या वादात अभिनेता कमाल आर खान याने ट्विट करून आगीत तेल ओतले आहे. कमाल आर खान याने एक्सवर पोस्ट करत हा वादग्रस्त मजकूर खरा असल्याचे म्हटले आहे. त्याच्या या वक्तव्यावरून आता कमाल आर खानवर सर्वच स्तरातून संतापाची लाट उसळली आहे.

‘छावा’ चित्रपटाला देशासह परदेशात पसंती मिळत असताना कमाल खान याने समीक्षा करतानाही कोतेपणा केल्याचे दिसून आले. ‘छावा’ चित्रपटाची समीक्षा करताना केवळ 1 स्टार दिल्यामुळे तो चर्चेत होताच. अशा पद्धतीने समीक्षा केल्यामुळे कमाल इंटरनेटवर ट्रोल झाला होता. पण त्यानंतर आता त्याने छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचे वादग्रस्त विधान एक्सवर पोस्ट केले. शिवाय हा मजकूर खरा असल्याचे त्याने म्हटल्यानंतर कमाल खानबद्दल मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे.

हिंदुस्थानात सामान्यपणे आपण कोणतीही माहिती शोधण्यासाठी विकिपिडिया वापरला जातो. माहितीचा स्त्रोत म्हणून विकिपिडियाचा वापर सर्वसाधारपणे केला जातो. परंतु विकिपिडियामध्ये छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात त्यांच्या प्रतिमेचे हनन करणारा मजकूर पोस्ट केला गेला होता. या मजकूरावरून देशभरातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या सर्व वादातच कमाल खान याने हाच मजकूर पुन्हा एक्सवर पोस्ट केल्यामुळे कमाल खानवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. 17 तारखेला कमाल खानने हा मजकूर पोस्ट केला. मजकूर पोस्ट झाल्यानंतर आता त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

टीम इंडियाने बांगलादेशला लोळवलं, 6 गडी राखून केला पराभव; शुभमन गिलने झळकावलं शतक टीम इंडियाने बांगलादेशला लोळवलं, 6 गडी राखून केला पराभव; शुभमन गिलने झळकावलं शतक
टीम इंडियानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात विजयानं केली आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 6 गडी राखून...
लाडक्या बहि‍णींना भेटून आदिती तटकरे यांची महत्वाची घोषणा, काय म्हणाल्या ?
चार वर्षांच्या ब्रेकनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचं टीव्हीवर कमबॅक; आता मध्येच सोडला शो
Apple चा सर्वात स्वस्त iPhone लॉन्च, मिळणार जबरदस्त कॅमेरा आणि फीचर्स; जाणून घ्या किंमत
मुंबईतल्या गोरेगावमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल
जालन्यातील खरपुडी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री सचिवालयाकडून चौकशीचे आदेश, अंबादास दानवेंनी उठवला होता आवाज
100 व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवाची दमदार सुरुवात, सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झालं उद्घाटन