टीम इंडियाने बांगलादेशला लोळवलं, 6 गडी राखून केला पराभव; शुभमन गिलने झळकावलं शतक

टीम इंडियाने बांगलादेशला लोळवलं, 6 गडी राखून केला पराभव; शुभमन गिलने झळकावलं शतक

टीम इंडियानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात विजयानं केली आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव करून टीम इंडियनं स्पर्धेची धमाकेदार सुरुवात केली. या विजयासह हिंदुस्थानी संघानं ग्रुप अ मध्ये टॉप 2 मध्ये स्थान मिळवण्यातही यश मिळवले आहे. या सामन्यात मोहम्मद शमी आणि शुभमन गिल हे टीम इंडियाचे विजयाचे हिरो ठरले आहेत. रोहित शर्मानं वादळी खेळी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. नाबाद शतक ठोकल्याबद्दल शुभमन गिलला सामनावीर म्हणून गौरविण्यात आलं.

या सामन्यात बांगलादेश संघाचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र संघाला चांगली सुरुवात मिळाली नाही. 35 धावांत 5 विकेट पडल्या होत्या. सामन्यात एक वेळ अशी आली की, बांगलादेशला 125 धावा करणेही कठीण वाटत होतं. पण झाकीर अली आणि तौहीद हृदयॉय यांनी 154 धावांची भागीदारी करून बांगलादेशला सामन्यात परत आणलं. झाकीर अली 68 धावा करून बाद झाला, पण तौहीद हृदयॉयने शतक झळकावून संघाला चांगल्या स्थितीत आणलं.

बांगलादेश संघाने 49.4 षटकांत सर्व विकेट गमावून 228 धावा केल्या. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने पाच, हर्षित राणा यांनी तीन आणि अक्षर पटेल यांनी एकाच षटकात दोन बळी घेतले. यातच 229 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना कर्णधार रोहित शर्माने शुभमन गिलसह हिंदुस्थानाला वादळी सुरुवात करून दिली. रोहित शर्मा 36 चेंडूत 41 धावा करून बाद झाला. तोपर्यंत धावसंख्या 70 च्या जवळ पोहोचली होती. यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्यात एक छोटीशी भागीदारी झाली. यादरम्यान, विराट कोहली 22 धावा करून बाद झाला. यावेळी शुभमन गिल एका टोकाला ठामपणे उभा राहून हिंदुस्थानची बाजू सामन्यात पकडून होता. त्याने श्रेयस अय्यर (15) आणि अक्षर पटेल (8) सोबत काही धावा केल्या. केएल राहुलसोबतच्या त्याच्या भागीदारीने सामना जिंकला. शुभमन गिलने 125 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. टीम इंडियाने हे लक्ष्य 46.3 षटकांत 4 गडी गमावून पूर्ण केले आणि गट अ मध्ये दुसरे स्थान मिळवले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“छावा चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला”, दिग्दर्शकावर गणोजी शिर्केंच्या वंशजांचे गंभीर आरोप “छावा चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला”, दिग्दर्शकावर गणोजी शिर्केंच्या वंशजांचे गंभीर आरोप
छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जादू केली आहे. छावा चित्रपटाने आतापर्यंत 219 कोटींचा गल्ला जमवला आहे. सध्या...
माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा?, मोदींचं नाव न घेता संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांची टीका
हिंदुस्थानात पुढील 5 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 2.80 कोटींहून अधिक होणार, IESA चा अहवाल
Ranji Trophy – अंतिम फेरीत विदर्भला भीडणार ‘हा’ संघ, पहिल्यांदाच फायनलमध्ये मारलीये एन्ट्री
Ratnagiri News – कासवांच्या वेळास गावात 32 घरट्यात 3579 अंडी संरक्षित, 50 पिल्ले समुद्रात झेपावली
दहावी पेपर फुटीप्रकरणी शालेय शिक्षण मंत्र्यांची महत्वाची माहिती, नेमका काय घडला प्रकार?
‘मला हलक्यात घेऊ नका, मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता…’; एकनाथ शिंदेंचा नेमका कोणाला इशारा?