युजवेंद्र आणि धनश्रीचा अखेर घटस्फोट! कायदेशीर प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात

युजवेंद्र आणि धनश्रीचा अखेर घटस्फोट! कायदेशीर प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात

भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. अखेर या चर्चेला ब्रेक लागला आहे. युजवेंद्र आणि धनश्रीला मुंबईतील वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. तिथे त्यांची शेवटची कायदेशीर प्रक्रिया पार पडणार असल्याचे सांगितले आहे. युजुवेंद्र आणि धनश्री आज न्यायाधीशांसमोर हजर राहतील, त्यानंतर त्यांना त्यांचे अधिकृत घटस्फोट प्रमाणपत्र मिळेल, असे सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, युजवेंद्र आणि धनश्रीने परस्पर संमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. तसेच गेल्या काही आठवड्यांपासून सोशल मीडियावरही दोघांमध्ये मतभेद आणि घटस्फोटाची चर्चा सुरू होती. त्याचबरोबर दोघांनी आपापल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन सोशल मीडिया पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्ट देखील घटस्फोटाकडे इशारा देत आहेत. इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये धनश्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्ट्रेस टू बी ब्लेस्ड… अशी पोस्ट धनश्रीने केली आहे. इतकचं नाही तर धनश्रीच्या या पोस्टवर युजवेंद्रने देखील स्टोरीवर एका पोस्ट शेअर करत त्या पोस्टमध्ये त्याने ‘देवाने माझं अनेकदा रक्षण केलं आहे…’, असं लिहिलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“छावा चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला”, दिग्दर्शकावर गणोजी शिर्केंच्या वंशजांचे गंभीर आरोप “छावा चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला”, दिग्दर्शकावर गणोजी शिर्केंच्या वंशजांचे गंभीर आरोप
छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जादू केली आहे. छावा चित्रपटाने आतापर्यंत 219 कोटींचा गल्ला जमवला आहे. सध्या...
माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा?, मोदींचं नाव न घेता संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांची टीका
हिंदुस्थानात पुढील 5 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 2.80 कोटींहून अधिक होणार, IESA चा अहवाल
Ranji Trophy – अंतिम फेरीत विदर्भला भीडणार ‘हा’ संघ, पहिल्यांदाच फायनलमध्ये मारलीये एन्ट्री
Ratnagiri News – कासवांच्या वेळास गावात 32 घरट्यात 3579 अंडी संरक्षित, 50 पिल्ले समुद्रात झेपावली
दहावी पेपर फुटीप्रकरणी शालेय शिक्षण मंत्र्यांची महत्वाची माहिती, नेमका काय घडला प्रकार?
‘मला हलक्यात घेऊ नका, मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता…’; एकनाथ शिंदेंचा नेमका कोणाला इशारा?