कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत आईचा मृत्यू, पण मृतांच्या यादीत नाव नाही; अनेक पीडित कुटुंबीयांनी व्यक्त केलं दुःख आणि रोष

कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत आईचा मृत्यू, पण मृतांच्या यादीत नाव नाही; अनेक पीडित कुटुंबीयांनी व्यक्त केलं दुःख आणि रोष

प्रयागराज येथे महाकुंभदरम्यान मौनी अमावस्येला अमृत स्नानाआधी चेंगराचेंगरीची घटना घडली होती. यामध्ये 30 जणांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र अजूनही मृतांचा खरा आकडा उत्तर प्रदेश सरकारकडून जाहीर करण्यात आलेला नाही. यातच आता अनेक असे पीडित कुटुंबीय आहेत, जे समोर येऊन आपलं दुःख सांगत सरकारविरोधात रोष व्यक्त करत आहेत. यात अनेक लोक असे आहेत ज्यांनी आपल्या कुटुंबीयांतील सदस्यांना या चेंगराचेंगरीच्या घटनेत गमावलं. यातच अनेक मृतांची नोंद सरकारी यादी करण्यात आली नसून त्यांच्या कुटुंबियांना कुठल्याही प्रकारची भरपाई सरकारच्या वतीने देण्यात आलेली नाही.

‘मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला, मात्र सरकार यादीत नावच नाही’

कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत प्रयागराज येथील रहिवासी सौम्या श्रीवास्तव यांची आई नीलम श्रीवास्तव यांचा मृत्यू झाला होता. याबाबत आपलं दुःख व्यक्त करत सौम्या श्रीवास्तव म्हणाल्या की, ”आई कुंभमेळ्यात स्नान करायला गेली होती. चेंगराचेंगरीत तिला आपला जीव गमवावा लागला. सरकारकडून मृतदेह मिळाला. त्यावर 5 हा आकडा लिहिलेला होता. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. अंत्यसंस्काराच्या वेळी एक पोलीस हवालदारही उपस्थित होता. असे असूनही, सरकारने जाहीर केलेल्या 30 मृतांच्या यादीत आईचे नाव नव्हते. यामुळे आम्हाला ना कोणतीही भरपाई मिळाली, ना कोणतीही सरकारी मदत.”

याचबद्दल आपलं दुःख व्यक्त करत नीलम श्रीवास्तव यांचे पती केसी श्रीवास्तव यांनी सांगितलं की, ”त्या संध्याकाळी जेव्हा सरकारने मृतांची यादी जाहीर केली तेव्हा माझ्या पत्नीचे नाव त्यात नव्हते. माझ्या पत्नीला चेंगराचेंगरीत जीव गमवावा लागला, याचे मला खूप दुःख आहे. प्रशासनाने मृतदेहाचा पंचनामाही केला, परंतु त्यांच्या आकडेवारीत समाविष्ट केला नाही. आम्ही सर्वांना सांगतो की, माझीपत्नी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडली, पण सरकार त्यावर विश्वास ठेवत नाही.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दहावी पेपर फुटीप्रकरणी शालेय शिक्षण मंत्र्यांची महत्वाची माहिती, नेमका काय घडला प्रकार? दहावी पेपर फुटीप्रकरणी शालेय शिक्षण मंत्र्यांची महत्वाची माहिती, नेमका काय घडला प्रकार?
SSC Paper Leak 2025: दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठी विषयाचा पेपर राज्यातील काही शहरांमध्ये फुटला. या पेपर फुटी प्रकरणाची गंभीर...
‘मला हलक्यात घेऊ नका, मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता…’; एकनाथ शिंदेंचा नेमका कोणाला इशारा?
पालघरमध्ये भीषण अपघात, मुख्यध्यापकानं दारूच्या नशेत आठ वाहनांना उडवलं
VIDEO: पूनम पांडेला भररस्त्यात जबरदस्तीने KISS करण्याचा प्रयत्न, प्रचंड घाबरलेल्या पूनमने फॅनला दिला धक्का
“काका खूप…”; शरद पोंक्षेंनी ‘छावा’बद्दल केलेल्या व्हिडीओवर चित्रपटातीलच एका अभिनेत्याची कमेंट
तुम्हीपण रात्री उशिरा झोपता? वेळीच व्हा सावध, वाढू शकतो या आजारांचा धोका
माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द करून राज्यपालांनी त्यांची हकालपट्टी करावी, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी