घरांसाठी गिरणी कामगार 6 मार्चला विधान भवनावर धडकणार

घरांसाठी गिरणी कामगार 6 मार्चला विधान भवनावर धडकणार

गिरणी कामगार व वारसांना मुंबईतच आपल्या हक्काची घरे मिळवण्यासाठी संयुक्त मराठी मुंबई चळवळसहित गिरणी कामगार एकजूट संघटनेने 6 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आझाद मैदान ते विधान भवन अशी महामोर्चाची हाक दिली आहे.

या गिरणी कामगार महामोर्चामध्ये सात गिरणी कामगार संघटना सहभागी होणार आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून गिरणी कामगारांना हक्काच्या घरांपासून वंचित ठेवण्यात येत आहे. ज्या गिरणी कामगारांनी या मुंबईला खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर नावारूपाला आणले त्याच गिरणी कामगारांना या मुंबईच्या बाहेर हाकलण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. लाखाहून अधिक गिरणी कामगार घरापासून वंचित आहेत. दुसरीकडे सरकार उद्योगपतींना विशेष सवलत देऊन मुंबईतील मोक्याच्या जागांचे खैरातीसारखी वाटप करत आहे. याचाच निषेध करण्यासाठी येत्या 6 मार्चला महामोर्चाचे आयोजन केले आहे.cx

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दहावी पेपर फुटीप्रकरणी शालेय शिक्षण मंत्र्यांची महत्वाची माहिती, नेमका काय घडला प्रकार? दहावी पेपर फुटीप्रकरणी शालेय शिक्षण मंत्र्यांची महत्वाची माहिती, नेमका काय घडला प्रकार?
SSC Paper Leak 2025: दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठी विषयाचा पेपर राज्यातील काही शहरांमध्ये फुटला. या पेपर फुटी प्रकरणाची गंभीर...
‘मला हलक्यात घेऊ नका, मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता…’; एकनाथ शिंदेंचा नेमका कोणाला इशारा?
पालघरमध्ये भीषण अपघात, मुख्यध्यापकानं दारूच्या नशेत आठ वाहनांना उडवलं
VIDEO: पूनम पांडेला भररस्त्यात जबरदस्तीने KISS करण्याचा प्रयत्न, प्रचंड घाबरलेल्या पूनमने फॅनला दिला धक्का
“काका खूप…”; शरद पोंक्षेंनी ‘छावा’बद्दल केलेल्या व्हिडीओवर चित्रपटातीलच एका अभिनेत्याची कमेंट
तुम्हीपण रात्री उशिरा झोपता? वेळीच व्हा सावध, वाढू शकतो या आजारांचा धोका
माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द करून राज्यपालांनी त्यांची हकालपट्टी करावी, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी