उत्तम आरोग्य हवंय तर तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्या!

उत्तम आरोग्य हवंय तर तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्या!

पाण्याला आपण जीवन म्हणून संबोधतो, म्ह्णूनच  निरोग़ी  आरोग्यासाठी  संतुलित  आहार, योग्य व्यायाम  याचबरोबर भरपूर  पाणी  पिण्याचा  सल्ला  दिला  जातो. शारिरीक  स्वास्थ्य  सुधारण्यासाठी हेच पाणी सकाळी अनशी पोटी व तांब्याच्या भांड्यात ठेवलेले प्यायल्यास त्याचा अधिक फायदा होतो.

काळानुरूप जीवनशैलीत बदल झाले व पारंपारिक वस्तूंची जागा पाश्चात्य संस्कृतीने  घेतली. तांब्याच्या  भांड्यात  ठेवलेले  पाणी का  प्यावे आयुर्वेदानुसार  तांब्याच्या  भांड्यात  ठेवलेले  पाणी  त्रिदोषहारक ( कफ , पित्त, वात) असते. त्यामुळे  किमान 8  तास तांब्याच्या  भांड्यात  ठेवलेले  पाणी नियमित प्यावे.

तांब्याच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी निर्जंतुक होते व आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात सामाविष्ट होतात. तसेच कफाची समस्या असलेल्यांनी या पाण्यामध्ये तुळशीचे पान टाकावेत. पित्त, अल्सर किंवा पोटात  ग़ॅसचा  विकार होणार्‍यांसाठी तांब्याच्या  भांडात ठेवलेले  पाणी पिणे अत्यंत हितकारी  आहे.  

तांब्यातील  जंतूनाशक गुणधर्मामुळे पोटातील जिवाणूंचा नाश  होतो, जळजळ होण्याची  समस्या  कमी  होते. तसेच  तांब्याच्या भांड्यात  ठेवलेले पाणी प्यायल्याने पचनक्रियेचा मार्ग स्वच्छ  होतो. परिणामी  पोट  स्वच्छ  राहण्यास मदत  होते. पचनसंस्थेला चालना देण्याबरोबरच  हे पाणी शरीरातील  अतिरिक्त  मेद कमी  करण्यास  मदत  करते. शरीराला आवश्यक मेद शोषून घेतल्यानंतर चरबी  वाढवणारे  अनावश्यक मेद बाहेर टाकण्यास मदत  होते.  यामुळे  तुमचे  वजन काबूत  राहण्यास  नक्कीच मदत होते.

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अ‍ॅन्टीबॅक्टेरीयल तसेच अ‍ॅन्टीवायरल असल्याने दाह कमी करण्यास मदत  होते. तांब्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. तसेच नवीन पेशींची निर्मीती होते. तांब्यामुळे शरीराच्या आतील जखमा विशेषतः पोटातील जखमा लवकर भरण्यास मदत होते.

(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

टीम इंडियाने बांगलादेशला लोळवलं, 6 गडी राखून केला पराभव; शुभमन गिलने झळकावलं शतक टीम इंडियाने बांगलादेशला लोळवलं, 6 गडी राखून केला पराभव; शुभमन गिलने झळकावलं शतक
टीम इंडियानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात विजयानं केली आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 6 गडी राखून...
लाडक्या बहि‍णींना भेटून आदिती तटकरे यांची महत्वाची घोषणा, काय म्हणाल्या ?
चार वर्षांच्या ब्रेकनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचं टीव्हीवर कमबॅक; आता मध्येच सोडला शो
Apple चा सर्वात स्वस्त iPhone लॉन्च, मिळणार जबरदस्त कॅमेरा आणि फीचर्स; जाणून घ्या किंमत
मुंबईतल्या गोरेगावमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल
जालन्यातील खरपुडी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री सचिवालयाकडून चौकशीचे आदेश, अंबादास दानवेंनी उठवला होता आवाज
100 व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवाची दमदार सुरुवात, सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झालं उद्घाटन