सरकारला बहुमताचं डिप्रेशन, या गंभीर आजारातून ते बाहेर पडायला तयार नाहीत; संजय राऊत यांचा घणाघात

सरकारला बहुमताचं डिप्रेशन, या गंभीर आजारातून ते बाहेर पडायला तयार नाहीत; संजय राऊत यांचा घणाघात

महायुती सरकारला डिप्रेशन आले आहे. हा अधिक गंभीर आजार असून बहुमताच्या डिप्रेशनमधून सरकार बाहेर पडायला तयार नाही. हे बहुमत चुकीच्या पद्धतीने मिळवले आहे. त्यातून मिळालेला विजय आणि त्या विजयाचा धक्का पचवता न आल्याने आलेले हे डिप्रेशन आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. मंत्री संजय शिरसाट यांच्या टीकेला ते उत्तर देत होते.

मी काय बोललो आहे हे समजण्यासाठी माणसाने आधी साक्षर असावे लागते. मला प्रश्न विचारला तेव्हा देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत? असे मी विचारले होते. त्या संदर्भात माझ्याकडे जी माहिती होती, ती मी दिली. लोकशाहीनुसार त्याच्यावर तुम्ही प्रत्युत्तर द्या ना, असे राऊत म्हणाले.

मुळात आपण कामाख्याला जाऊन अघोरी विधी केलेत की नाही, यावर कुणीही उत्तर देत नाही. अघोरी विद्या अंधश्रद्धेच्या कायद्याच्या विरोधामध्ये असतानासुद्धा अशा प्रकारे राजकारणामध्ये कुणी काम करत असेल, तर ते महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कृतीला आणि परंपरेला शोभणारे नाही, असे मी म्हणत असेल आणि मला वेडे ठरवत असेल तर… लोकांनी महात्मा फुले आणि गाडगे महाराज यांनाही वेडे ठरवले होते. त्यामुळे हे पुरोगामी लोक नाही. यांना जादूटोणा मंत्र याच्यात विश्वास आहे, या माध्यमातून जिंकलो असा आत्मविश्वास आहे त्यांना आहे. पण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असून आम्हाला त्यांची, त्यांच्या कुटुंबाची चिंता आहे. पण कुणीतरी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. ही आमची चिंता असून शिरसाट यांना विजयाचे डिप्रेशन आहे. कारण हा विजय सरळ नाही, असेही राऊत म्हणाले.

महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणं संघाचा जुना अजेंडा, सोलापूरकरांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांचा संताप

दरम्यान, वाल्मीक कराड याचा व्हिडीओ पाहिला म्हणून बीडच्या धारूर येथे एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडमध्येच होते आणि त्यांची पाठ वळताच हा प्रकार घडला. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, बीडमध्ये फडणवीस यांनी मी खपवून घेणार नाही, सहन करणार नाही, कायदा हातात घेणाऱ्यांना वठणीवर आणणार असे म्हटले. आता सुरेश धस यांनी हा मुद्दाही त्यांच्यापर्यंत न्यावा. फडणवीस बाहुबली मुख्यमंत्री आहेत धस म्हणतात. आता बाहुबलींनी एका सामान्य माणसावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा मार्गी लावावा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“छावा चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला”, दिग्दर्शकावर गणोजी शिर्केंच्या वंशजांचे गंभीर आरोप “छावा चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला”, दिग्दर्शकावर गणोजी शिर्केंच्या वंशजांचे गंभीर आरोप
छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जादू केली आहे. छावा चित्रपटाने आतापर्यंत 219 कोटींचा गल्ला जमवला आहे. सध्या...
माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा?, मोदींचं नाव न घेता संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांची टीका
हिंदुस्थानात पुढील 5 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 2.80 कोटींहून अधिक होणार, IESA चा अहवाल
Ranji Trophy – अंतिम फेरीत विदर्भला भीडणार ‘हा’ संघ, पहिल्यांदाच फायनलमध्ये मारलीये एन्ट्री
Ratnagiri News – कासवांच्या वेळास गावात 32 घरट्यात 3579 अंडी संरक्षित, 50 पिल्ले समुद्रात झेपावली
दहावी पेपर फुटीप्रकरणी शालेय शिक्षण मंत्र्यांची महत्वाची माहिती, नेमका काय घडला प्रकार?
‘मला हलक्यात घेऊ नका, मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता…’; एकनाथ शिंदेंचा नेमका कोणाला इशारा?