कुंभमेळ्यातील मृतांच्या संख्येवर बोलताच भाजपवाल्यांमध्ये ‘भगदड’ उडाली; संजय राऊत यांचा सणसणीत टोला

कुंभमेळ्यातील मृतांच्या संख्येवर बोलताच भाजपवाल्यांमध्ये ‘भगदड’ उडाली; संजय राऊत यांचा सणसणीत टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी राज्यसभेत देशातील लोकशाही आणि महाकुंभमध्ये झालेल्या दुर्घटनेबाबत भाष्य केले. महाकुंभमध्ये झालेली घटना ही मनुष्यवधाची असून या दुर्घटनेला सरकारच जबाबदार असा हल्ला त्यांनी सरकारवर चढवला. यावेळी त्यांनी कुंभमेळ्यातील मृतांच्या आकडेवारीबाबत भाष्य करताच तुमची वेळ संपली आहे, त्यामुळे तुम्ही जे बोलत आहात, ते रेकॉर्ड होणार नाही, असे सभापतींनी सांगितले. यावर संजय राऊत यांनी एक्सवरील पोस्टद्वारे टीका करत कुंभमेळ्यातील मृतांच्या संख्येवर बोलताच भाजपवाल्यांमध्ये ‘भगदड’ उडाली असे म्हटले आहे.

कुंभमेळा हा फक्त राजकीय इव्हेंट करण्यात आला. चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना घडल्यानंतर चेंगराचेंगरी झालीच नाही. ती अफवा आहे, असे खोटे सांगण्यात आले. जनतेचा मृत्यू होत असेल आणि सरकार सांगत असेल की कोणतीही दुर्घटना घडलीच नाही, तर हे खूप गंभीर आहे. या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला आणि 60 जण जखमी झाले, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, हे आकडे खरे आहेत काय? सरकारने सत्य लपवू नये, सत्या देशासमोर मांडावे, एकाही जणाचा मृत्यू झाला असेल तर तो मनुष्यवध आहे. त्यासाठी सरकार जबाबदार आहे, असही संजय राऊत यांनी सुनावले.

या दुर्घटनेच 30 जणांचा मृत्यू आणि 60 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात आकडेवारी खूप मोठी आहे. या दुर्घटनेत सुमारे 2 हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अनेक मृतदेह कचऱ्यात पडल्याचेही सांगण्यात येत आहे, असे संजय राऊत यांनी सांगितल्यानंतर सभापतींना तुमची वेळ संपली आहे, असे सांगत त्यांनी बोलण्यापासून रोखले. तसेच तुम्ही जी आकडेवारी सांगत आहात. त्यांची पुष्टी करा, असेही सभापतींनी सांगितले.

याबाबत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी म्हटले आहे की, आपण काय चुकीचे बोललो होतो. मात्र, आपला माइक बंद करण्यात आला. कुंभमेळ्याच्या दुर्घटनेत 30 पेक्षा जास्त जणांनी जीव गमावला आहे. आपण अवढेच बोललो आणि सभागृहात बसलेल्या भाजपवाल्यांमध्ये ‘भगदड’ उडाली; त्यांचे असा का झाले, असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजपला जबरदस्त टोला लगावला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

 ‘तो’ भूखंड काढून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांकडून हालचाली  ‘तो’ भूखंड काढून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांकडून हालचाली
मंगळवार पेठेतील ससून हॉस्पिटल समोरील रस्ते विकास महामंडळाचा सुमारे 400 कोटी रुपयांचा भूखंड 60 कोटी रुपयांमध्ये बिल्डरच्या घशात घातल्याप्रकरणी आता...
ओवी, अभंग, आर्या आणि तरुणाईचे रॅप; महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये मराठी साहित्ययात्री संमेलन
महायुतीचा पायगुण… सरकारी नोकऱ्या 16 टक्क्यांनी घटल्या, बेरोजगारी हटविण्याची घोषणा हवेतच
विधानसभेसारखी चूक नको, आता महापालिकेसाठी सज्ज व्हा! उद्धव ठाकरे यांचे आदेश
धावत्या लोकलमध्ये तरुणाचा तीन प्रवाशांवर चाकूहल्ला, कल्याणहून सुटलेल्या दादर फास्टमध्ये रक्तरंजित थराssर
दिल्लीत आजपासून गर्जते मराठी, मराठी हिताचे व्यापक निर्णय होणार का? छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी सज्ज
शिंदेंना एकाच दिवशी फडणवीसांचे दोन धक्के, 1400 कोटींचे मुंबई सफाईचे कंत्राट रद्द, जालन्यातील 900 कोटींच्या सिडको प्रकल्पाची चौकशी