मोदी-ट्रम्प चांगले मित्र तरीही हिंदुस्थानींची अशी अवस्था; प्रियंका गांधी यांचा निशाणा

मोदी-ट्रम्प चांगले मित्र तरीही हिंदुस्थानींची अशी अवस्था; प्रियंका गांधी यांचा निशाणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यापासूनच मोठ-मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली. अशातच बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या लोकांविरोधातही ट्रम्प प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. यावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. याविरोधात संसदेतही पडसाद उमटले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बुधवारी संसद भवनाबाहेर निदर्शने केली.

अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांना हद्दपार करण्याविरोधात काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी संसद भवनाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे अमेरिकन समकक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संबंधांवर प्रश्न उपस्थित केले. “पंतप्रधान मोदी ट्रम्प यांचे इतके चांगले मित्र आहेत तर मग त्यांनी हे का होऊ दिले? असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला.

‘अमेरिकेतून हद्दपार केलेल्या बेकायदा हिंदुस्थांनींना हातात बेड्या आणि पायात साखळदंड घालून रवाना करण्यात आले. आपण आपले जहाज या हिंदुस्थानी नागरिकांना घेण्यासाठी का पाठवू शकलो नाही? हातकड्या आणि बेड्या घालून पाठवणे ही लोकांसोबत वागण्याची कोणती पद्धत आहे. अशा अमानवी परिस्थितीवर परराष्ट्र मंत्री आणि पंतप्रधानांनी उत्तर द्यावे, अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“छावा चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला”, दिग्दर्शकावर गणोजी शिर्केंच्या वंशजांचे गंभीर आरोप “छावा चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला”, दिग्दर्शकावर गणोजी शिर्केंच्या वंशजांचे गंभीर आरोप
छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जादू केली आहे. छावा चित्रपटाने आतापर्यंत 219 कोटींचा गल्ला जमवला आहे. सध्या...
माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा?, मोदींचं नाव न घेता संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांची टीका
हिंदुस्थानात पुढील 5 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 2.80 कोटींहून अधिक होणार, IESA चा अहवाल
Ranji Trophy – अंतिम फेरीत विदर्भला भीडणार ‘हा’ संघ, पहिल्यांदाच फायनलमध्ये मारलीये एन्ट्री
Ratnagiri News – कासवांच्या वेळास गावात 32 घरट्यात 3579 अंडी संरक्षित, 50 पिल्ले समुद्रात झेपावली
दहावी पेपर फुटीप्रकरणी शालेय शिक्षण मंत्र्यांची महत्वाची माहिती, नेमका काय घडला प्रकार?
‘मला हलक्यात घेऊ नका, मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता…’; एकनाथ शिंदेंचा नेमका कोणाला इशारा?