धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी आजाराने ग्रासले, दोन मिनिटेही बोलणे कठीण

धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी आजाराने ग्रासले, दोन मिनिटेही बोलणे कठीण

वादाच्या भोवऱ्यात असलेले अन्न आणि नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना ‘बेल्स पाल्सी’ हा आजार झाला आहे. या आजारामुळे आपल्याला सलग दोन मिनिटेही बोलता येत नसल्याची माहिती त्यांनी स्वतःच ‘एक्स’वर दिली आहे.

आपल्या दोन्ही डोळय़ांवर पंधरा दिवसांपूर्वी डॉ. तात्या लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्र्ाक्रियेनंतर दहा दिवस तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हापासून डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. याच दरम्यान ‘बेल्स पाल्सी’ नावाच्या आजाराचे निदान झाले. या आजारावर रिलायन्स हॉस्पिटलमधील डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. या आजारामुळे मला सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नाही. या आजाराची आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कल्पना दिल्याचेही धनंजय मुंडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रसिद्ध गायक प्रीतम यांच्या ऑफिसमधून 40 लाख लंपास करणाऱ्याच्या मुसक्या आवळ्या, चोरी करण्याचे धक्कादायक कारण समोर प्रसिद्ध गायक प्रीतम यांच्या ऑफिसमधून 40 लाख लंपास करणाऱ्याच्या मुसक्या आवळ्या, चोरी करण्याचे धक्कादायक कारण समोर
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या ऑफिसमध्ये काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. यावेळी प्रीतम चक्रवर्ती यांच्या ऑफिसमधील 40...
Ranveer Allahbadia चं समर्थन करणं राखी सावंतला भोवलं, पोलिसांनी बजावलं समन्स
उणे 6 ते 15 अंश सेल्सिअस तापमान, रक्त गोठविणारी थंडी; कोल्हापूरच्या अन्वीने केदारकंठा शिखरावर साजरी केली शिवजयंती
“छावा चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला”, दिग्दर्शकावर गणोजी शिर्केंच्या वंशजांचे गंभीर आरोप
माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा?, मोदींचं नाव न घेता संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांची टीका
हिंदुस्थानात पुढील 5 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 2.80 कोटींहून अधिक होणार, IESA चा अहवाल
Ranji Trophy – अंतिम फेरीत विदर्भला भीडणार ‘हा’ संघ, पहिल्यांदाच फायनलमध्ये मारलीये एन्ट्री