ऑल द बेस्ट! आजपासून दहावीची परीक्षा, राज्यभरातून 16 लाख 11 हजार विद्यार्थी परीक्षा देणार
On
विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरविणारी दहावीची (एसएससी) लेखी परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहे. मुंबई, कोकण, नाशिकसह राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेला 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षा 17 मार्चपर्यंत चालेल.
- प्रश्नपत्रिकेची पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ते केंद्रांपर्यंत पोहोचवून वितरीत करेपर्यंतचे चित्रीकरण केले जाणार आहे. जीपीएसची, ड्रोनसारख्या आधुनिक तंत्राच्या मदतीने गैरप्रकार रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
- विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचायचे आहे. पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात येतील. गैरमार्ग अवलंबणाऱया परीक्षा केंद्रांची (शाळांची) मान्यता कायमची रद्द करण्यात येणार आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
22 Feb 2025 02:03:55
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या ऑफिसमध्ये काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. यावेळी प्रीतम चक्रवर्ती यांच्या ऑफिसमधील 40...
Comment List