गुजरातला अंतिम फेरीसाठी 28 धावांची गरज

गुजरातला अंतिम फेरीसाठी 28 धावांची गरज

दुसरा उपांत्य सामना अनिर्णितावस्थेकडे झुकला आहे. गेल्या चार दिवसांत दोन डावही पूर्ण होऊ शकले नाहीत, मात्र केरळच्या 457 धावांच्या खेळानंतर गुजरातने बुधवारी 1 बाद 222 अशी जबरदस्त सलामी दिली होती. आजही गुजरातने जयमीत पटेलच्या 74 धावांमुळे चौथ्या दिवसअखेर 7 बाद 429 अशी मजल मारली आहे. आता त्यांना पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी अवघ्या 28 धावांची गरज आहे आणि गुजरातचा खेळ पाहता ते आघाडी घेण्याची दाट शक्यता आहे. तसेच केरळला आघाडी घेण्यासाठी गुजरातचा डाव 456 धावांच्या आत बाद करणे अनिवार्य आहे. गेल्या सामन्यातही केरळ अवघ्या एका धावेच्या आघाडीमुळे उपांत्य फेरीत पोहोचला होता. आता अंतिम फेरीतही स्थान पक्के करण्यासाठी त्यांना किमान एका धावेची आघाडी घ्यावीच लागणार आहे. जलज सक्सेनाने 4 विकेट घेत झुंजार मारा केला आहे. जर उद्या केरळला आघाडी मिळवून देण्यात तो यशस्वी ठरला तर तो गुजरातसाठी फार मोठा धक्का असेल. चौथ्या दिवसअखेर गुजरातचे जयमीत पटेल (74) आणि सिद्धार्थ देसाईने आठव्या विकेटसाठी 72 धावांची भागी रचत आपली पावले अंतिम फेरीच्या दिशेने टाकली आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रसिद्ध गायक प्रीतम यांच्या ऑफिसमधून 40 लाख लंपास करणाऱ्याच्या मुसक्या आवळ्या, चोरी करण्याचे धक्कादायक कारण समोर प्रसिद्ध गायक प्रीतम यांच्या ऑफिसमधून 40 लाख लंपास करणाऱ्याच्या मुसक्या आवळ्या, चोरी करण्याचे धक्कादायक कारण समोर
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या ऑफिसमध्ये काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. यावेळी प्रीतम चक्रवर्ती यांच्या ऑफिसमधील 40...
Ranveer Allahbadia चं समर्थन करणं राखी सावंतला भोवलं, पोलिसांनी बजावलं समन्स
उणे 6 ते 15 अंश सेल्सिअस तापमान, रक्त गोठविणारी थंडी; कोल्हापूरच्या अन्वीने केदारकंठा शिखरावर साजरी केली शिवजयंती
“छावा चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला”, दिग्दर्शकावर गणोजी शिर्केंच्या वंशजांचे गंभीर आरोप
माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा?, मोदींचं नाव न घेता संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांची टीका
हिंदुस्थानात पुढील 5 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 2.80 कोटींहून अधिक होणार, IESA चा अहवाल
Ranji Trophy – अंतिम फेरीत विदर्भला भीडणार ‘हा’ संघ, पहिल्यांदाच फायनलमध्ये मारलीये एन्ट्री