‘जात बदनाम होतीये, गुन्हे करायचे अन्…’; आव्हाडांचा पुन्हा एकदा मुंडेंवर हल्लाबोल

‘जात बदनाम होतीये, गुन्हे करायचे अन्…’; आव्हाडांचा पुन्हा एकदा मुंडेंवर हल्लाबोल

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं असून, राजकीय आरोप -प्रत्यारोप देखील सुरू असल्याचं पाहायला मिळत आहेत. आज पुन्हा एकदा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘गुन्हा केल्यानंतर जाती आड का लपता? मी जातीवंत वंजारी आहे. माझ्या कुटुंबाने हमाली केली. तुम्ही आणि वाल्मिक कराड यांनी केलेल्या कृत्यामुळे जात बदनाम होत आहे,’ असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले आव्हाड?   

‘गुन्हा केल्यानंतर जाती आड का लपता? मी जातीवंत वंजारी आहे. माझ्या कुटुंबाने हमाली केली. तुम्ही आणि वाल्मिक कराड यांनी केलेल्या कृत्यामुळे जात बदनाम होत आहे, याच्यावर हल्ले झाले, त्याच्या हत्या झाल्या.   जा लोकांचा छळ झाला ते लोक वंजारी नाहीत का? तुम्ही लोकांचा छळ केला. तुम्ही लोकांना गुलाम केलं, त्यांना राजकारणासाठी वापरलं’ असा आरोप यावेळी आव्हाड यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, पोलीस फक्त वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याशिवाय कोणाचं ऐकत नाही. असे तर इन्सपेक्टर आहेत. शासकीय यंत्रणा पोखरली जात आहे. खरा आका धनंजय मुंडे हेच आहेत. 11 वर्ष एकच पोलीस एका ठिकाणी कसा? आका आणि काका दोन्ही इथेच बसतात, काहीही होणार नाही, असा हल्लाबोल यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

दमानियांचा हल्लाबोल 

दरम्यान दुसरीकडे अंजली दमानिया यांनी देखील आज पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी पीसी घेतली. मला वाटेल ती नावे ठेवली. दमानिया नाही तर बदनामीया नावं ठेवलं. पुराविया ठेवलं असतं तर चाललं असतं. बदनाम लोकांचे मी पुरावे देते, त्यामुळे माझं काही नाव ठेवलं तरी मला फरक पडत नाही, बीडमध्ये जाऊन दादागिरी करायची, मामीची जमीन बळकवायची हे सगळं सुरू आहे, असा हल्लाबोल यावेळी दमानिया यांनी केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

 ‘तो’ भूखंड काढून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांकडून हालचाली  ‘तो’ भूखंड काढून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांकडून हालचाली
मंगळवार पेठेतील ससून हॉस्पिटल समोरील रस्ते विकास महामंडळाचा सुमारे 400 कोटी रुपयांचा भूखंड 60 कोटी रुपयांमध्ये बिल्डरच्या घशात घातल्याप्रकरणी आता...
ओवी, अभंग, आर्या आणि तरुणाईचे रॅप; महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये मराठी साहित्ययात्री संमेलन
महायुतीचा पायगुण… सरकारी नोकऱ्या 16 टक्क्यांनी घटल्या, बेरोजगारी हटविण्याची घोषणा हवेतच
विधानसभेसारखी चूक नको, आता महापालिकेसाठी सज्ज व्हा! उद्धव ठाकरे यांचे आदेश
धावत्या लोकलमध्ये तरुणाचा तीन प्रवाशांवर चाकूहल्ला, कल्याणहून सुटलेल्या दादर फास्टमध्ये रक्तरंजित थराssर
दिल्लीत आजपासून गर्जते मराठी, मराठी हिताचे व्यापक निर्णय होणार का? छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी सज्ज
शिंदेंना एकाच दिवशी फडणवीसांचे दोन धक्के, 1400 कोटींचे मुंबई सफाईचे कंत्राट रद्द, जालन्यातील 900 कोटींच्या सिडको प्रकल्पाची चौकशी