बीडचा कटप्पा कोण? शिवगामी कोण? बल्लालदेव कोण, हे पाहावं लागेल, अंजली दमानिया यांचा मोठा सूचक इशारा

बीडचा कटप्पा कोण? शिवगामी कोण? बल्लालदेव कोण, हे पाहावं लागेल, अंजली दमानिया यांचा मोठा सूचक इशारा

बीड जिल्ह्यातील राजकारणात बाहुबली, कटप्पा, शिवगामी, बल्लालदेव कोण हे पाहावं लागेल असं सूचक वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले. बीडमधील आष्टीतील एका कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांनी आपण शिवगामीच्या भूमिकेत असल्याचे तर देवेंद्र फडणवीस हे बाहुबली असल्याचे वक्तव्य केले होते. गेल्या दोन दिवसांपासून खून, घोटाळ्याने बीड जिल्हा राज्याच्याच नाही तर देशाच्या नकाशावर आला आहे. त्यातच आता दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोपांची मालिका सुरू झाल्यानंतर राजकारणात आता नवीन वादळं तर येणार नाही ना? अशी चर्चा रंगली आहे.

धनंजय मुंडेंवर पु्न्हा डागली तोफ

धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना पावणे तीनशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. हे आरोप मुंडे यांनी फेटाळले. त्या बदनामिया असल्याचा आरोप केला. त्यानंतर आज अंजली दमानिया यांनी त्यांच्या आरोपांना, दाव्यांना पुष्टी देण्यासाठी थेट त्या उत्पादनाची ऑनलाईन खरेदीची करून दाखवली आणि मुंडे कसे खोटे बोलत आहेत, ते मांडण्याचा प्रयत्न केला.

ब्रँड स्प्रे, आणि इफकोचा नॅनो युरियाचे काही प्रोडक्ट विकच घेतले , १८४ रुपये लिटर पडले, सरकारने ह्या बाटल्या २२० रुपयाने विकत घेतल्या, असे त्यांनी या खरेदीतून दाखवले. शेतकर्‍यांचे पैसे खाल्ले, वाल्मिक कराडला मोठं केलं, संतोष देशमुख यांचा जीव गेला, असे अर्थकारण, सत्ताकारण आणि राजकारणाचे पदर त्यांनी उलगडले.

ही तर दहशत माजवण्याचा प्रकार

वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्या म्हणून अशोक मोहिते नावाच्या तरूणाला मारहाण झाली हे संतापजनक आहे, हेच वाढदिवसाचे स्टेटस ठेवत आहेत, हे साफ चुकीचं आहे. ही दहशत माजवण्याचा प्रकार आहे, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला.

अशोक मोहितेला मारहाण करणारे तरुण आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र आहेत. वैजनाथ बांगर, अभिषेक सानपच्या स्टेटसवर आंधळेचा फोटो ठेवला. दोन्ही तरुणांनी कृष्णा आंधळेच्या वाढदिवसानिमित्त स्टेटस ठेवलेलं आहेत हा प्रकार संतापजनक आहे. आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप दमानिया यांनी केला.

धनंजय मुंडेवर कारवाई का नाही?

धनंजय मुंडेंनी कोणतीच कारवाई नाही का तर ते राज्यातील दोन मोठ्या नेत्यांचे जवळचे मित्र आहेत, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. मनोज जरांगे हे पण याबाबत बोलत आहेत ही मोठी गोष्ट आहे. विष्णू चाटेनी बड्या नेत्याला फोन केल्याचा, संशय आहे हे आधीच सांगितलं आहे. विष्णू चाटेने धनंजय मुंडेंना फोन केला का? हा महत्वाचा विषय आहे, असे दमानिया म्हणाल्या.

दमानियांचे मोठे संकेत

बीडचा कटप्पा कोण ? हे पाहावं लागेल, शिवगामी कोण? बल्लालदेव कोण असे सगळे प्रकार संतापजनक आहे.बीडमध्ये जे राजकारण सुरू आहे ते चुकीचं आहे. राजकारणी एकमेकांना मदत करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातील राजकारणात बाहुबली, कटप्पा, शिवगामी, बल्लालदेव कोण हे पाहावं लागेल असं सूचक वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले. त्यामुळे राजकारणात आता नवीन वादळं तर येणार नाही ना? अशी चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रसिद्ध गायक प्रीतम यांच्या ऑफिसमधून 40 लाख लंपास करणाऱ्याच्या मुसक्या आवळ्या, चोरी करण्याचे धक्कादायक कारण समोर प्रसिद्ध गायक प्रीतम यांच्या ऑफिसमधून 40 लाख लंपास करणाऱ्याच्या मुसक्या आवळ्या, चोरी करण्याचे धक्कादायक कारण समोर
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या ऑफिसमध्ये काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. यावेळी प्रीतम चक्रवर्ती यांच्या ऑफिसमधील 40...
Ranveer Allahbadia चं समर्थन करणं राखी सावंतला भोवलं, पोलिसांनी बजावलं समन्स
उणे 6 ते 15 अंश सेल्सिअस तापमान, रक्त गोठविणारी थंडी; कोल्हापूरच्या अन्वीने केदारकंठा शिखरावर साजरी केली शिवजयंती
“छावा चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला”, दिग्दर्शकावर गणोजी शिर्केंच्या वंशजांचे गंभीर आरोप
माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा?, मोदींचं नाव न घेता संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांची टीका
हिंदुस्थानात पुढील 5 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 2.80 कोटींहून अधिक होणार, IESA चा अहवाल
Ranji Trophy – अंतिम फेरीत विदर्भला भीडणार ‘हा’ संघ, पहिल्यांदाच फायनलमध्ये मारलीये एन्ट्री