मी इस्लाम स्वीकारला तर…, संन्यास घेतल्यानंतर ममता कुलकर्णीचं मोठं वक्तव्य

मी इस्लाम स्वीकारला तर…, संन्यास घेतल्यानंतर ममता कुलकर्णीचं मोठं वक्तव्य

एक काळ बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने संन्यास घेतला आहे. बॉलिवूडमध्ये करीयर यशाच्या शिखरावर असताना ममता अचानक गायब झाली. त्यानंतर अभिनेत्रीच्या नावाची चर्चा अंडरवर्ल्ड डॉनसोबत देखील होऊ लागली. पण आता संन्यास घेतल्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. संन्यास घेतल्यानंतर नुकताच झालेल्या मुलाखतीत ममताने मुस्लिम धर्म स्वीकारला तर त्यात वाईट काय? असं वक्तव्य केलं आहे.

मुलाखतीत ममताला ‘धर्म बदलून विकी गोस्वामी सोबत लग्न करावं लागलं का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ममता म्हणाली, ‘यामध्ये काहीही तथ्य नाही… मी हवन – यज्ञ करणारी महिली आहे. मी आत्मपरीक्षण केलं आहे. माझ्यासाठी सर्व धर्म समान आहे…’

 

 

‘मी इस्लाम धर्माचा स्वीकार केला तरी त्यामध्ये काही गैर नाही… यात काही वाईट आहे…. असं मला वाटत नाही. लोकांनी इस्लामचा चुकीचा अर्थ काढला आहे आणि ती त्यांची चूक आहे. मी कुराण पठण केलं आहे. बायबल वाचलं आहे. देव सर्वांना एकच शिकवण देतो…’ असं देखील ममता कुलकर्णी म्हणाली.

सांगायचं झालं तर, एक काळ असा होता, जेव्हा ममताचं नाव ड्रग्स माफिया विक्की गोस्वामी याच्यासोबत जोडण्यात आलं होत. ममताने विकीसोबत लग्न केलं अशा चर्चांनी देखील जोर धरला होता. यावर ममता म्हणाली, ‘मी विकीसोबत लग्न केलं नाही…’ सध्या सर्वत्र ममता कुलकर्णी हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

ममता कुलकर्णीचे सिनेमे

ममता कुलकर्णीच्या बॉलिवूड प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर, तिने अभिनेता शाहरुख खान, सलमान खान यांसारख्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली आहे. बॉलिवूडमध्ये सक्रिय असताना अभिनेत्रीने ‘अशांत’, ‘आशिक आवारा’, ‘करण अर्जुन’ आणि ‘वक़्त हमारा है’ या सिनेमांमध्ये काम केलं. अभिनेत्रीवे 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तिरंगा’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आजही अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

टीम इंडियाने बांगलादेशला लोळवलं, 6 गडी राखून केला पराभव; शुभमन गिलने झळकावलं शतक टीम इंडियाने बांगलादेशला लोळवलं, 6 गडी राखून केला पराभव; शुभमन गिलने झळकावलं शतक
टीम इंडियानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात विजयानं केली आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 6 गडी राखून...
लाडक्या बहि‍णींना भेटून आदिती तटकरे यांची महत्वाची घोषणा, काय म्हणाल्या ?
चार वर्षांच्या ब्रेकनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचं टीव्हीवर कमबॅक; आता मध्येच सोडला शो
Apple चा सर्वात स्वस्त iPhone लॉन्च, मिळणार जबरदस्त कॅमेरा आणि फीचर्स; जाणून घ्या किंमत
मुंबईतल्या गोरेगावमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल
जालन्यातील खरपुडी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री सचिवालयाकडून चौकशीचे आदेश, अंबादास दानवेंनी उठवला होता आवाज
100 व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवाची दमदार सुरुवात, सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झालं उद्घाटन