सांडपाणी, जलपर्णीने घेतला शेकडो माशांचा बळी; सिद्धेश्वर तलावात मृत माशांचा खच; पालिकेचा प्रदूषण नियंत्रण विभाग करतोय काय?

सांडपाणी, जलपर्णीने घेतला शेकडो माशांचा बळी; सिद्धेश्वर तलावात मृत माशांचा खच; पालिकेचा प्रदूषण नियंत्रण विभाग करतोय काय?

तलावांचे सुशोभीकरण आणि संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात येतो. पण प्रत्यक्षात तलावात होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात ठाणे महापालिका गंभीर नसल्याचे उघड झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सिद्धेश्वर तलावात सांडपाणी, जलपर्णीने आज हजारो माशांचा बळी घेतला. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही तलाव स्वच्छ करण्यात आला नसल्याने महापालिकेचा प्रदूषण नियंत्रण विभाग करतोय काय? असा सवाल ठाणेकरांनी केला आहे.

तलावांचे शहर म्हणून ठाण्याची ओळख आहे. मात्र ही ओळख आता हळूहळू पुसू लागली की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. शहरात जेमतेम 30 तलाव शिल्लक असून बरेच तलाव अत्यंत प्रदूषित झाले आहेत. सिद्धेश्वर तलावातील हजारो माशांचा मृत्यू झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. सिद्धेश्वर तलावाला झोपडपट्टीचा विळखा पडला असून मोठ्या प्रमाणात सांडपाणी देखील सोडण्यात येते. तसेच हा तलाव डम्पिंग ग्राऊंड झाला असून स्थानिक नागरिक घरातील कचरा थेट तलावात फेकत असल्याचे निदर्शनास आले आहे.

लवकरच उपाययोजना
सिद्धेश्वर तलावात मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जलपर्णीदेखील मोठ्या प्रमाणावर आहे. तलावातील मृत मासे आणि जलपर्णी हटवण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले आहे. तलावात सांडपाणी जाणार नाही याबाबत आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना करण्यात येणार आहे.
मनीषा प्रधान (मुख्य पर्यावरण अधिकारी)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Pahalgam Terror Attack : अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे का? शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया काय? Pahalgam Terror Attack : अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे का? शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया काय?
मंगळवारी पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू...
Sharad Pawar : पुलवामासह अनेक हल्ले झाले, तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही, आज का होतेय? शरद पवार यांचा सवाल
“या” लोकांनी आंबा खाल्ल्यास होईल नुकसान! तुम्हीही यादीत आहात का? वाचा सविस्तर!
महेश भट्ट-पूजा भट्ट यांच्या चुंबनावर पहिल्यांदाच बोलला राहुल भट्ट; म्हणाला, ‘आम्ही लहानपणापासून पाहत आलोय की…’
आपापल्या राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार करा, केंद्राचे राज्य सरकारांना आदेश
सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन, हजारो पर्यटक अडकले
Navi Mumbai Crime – सीवूडमध्ये नराधम स्कूल बस चालकाचा 4 वर्षांच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार