घोडबंदर रोडवर वाहनचालकांचा चार दिवस घामटा निघणार, रस्ते दुरुस्तीसाठी गायमुख घाटाचा एक मार्ग बंद

घोडबंदर रोडवर वाहनचालकांचा चार दिवस घामटा निघणार, रस्ते दुरुस्तीसाठी गायमुख घाटाचा एक मार्ग बंद

वाहतूककोंडीने ठाणेकरांचे आधीच कंबरडे मोडले असताना घोडबंदर रोडवर वाहनचालकांचा चार दिवस घामटा निघणार आहे. ठाण्याहून घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या वाहिनीवरील गायमुख घाटच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. त्यामुळे येत्या 26 ते 29 एप्रिलपर्यंत एक मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, वाहतुकीत बदल करण्यात आल्याने ठाण्यात वाहतूककोंडी होणार आहे.

ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या घोडबंदर रोडवरून गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशसह अन्य राज्यांतून येणाऱ्या सर्वच प्रकारच्या वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय घोडबंदर परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण वाढले आहे. दुसरीकडे या मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्याने वाहनचालकांना दररोज वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी गायमुख घाटरस्त्याच्या कामासाठी वाहतूक बदल केले आहेत.

ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना वाय जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणून वाहने वाय जंक्शनकडून खारेगाव, माणकोली, अंजुरफाटामार्गे इच्छितस्थळी जातील.

मुंब्रा, कळव्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेशबंदी आहे. पर्यायी मार्ग मुंब्रा, कळव्याकडून घोडबंदरकडे जाणारी वाहने खारेगाव टोलनाका, माणकोली, अंजुरफाटामार्गे जातील.

गुजरातहून घोडबंदरमार्गे येणाऱ्यांना वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेशबंद तर या वाहनांना कामण, अंजुरफाटा, माणकोली, भिवंडीमार्गे इच्छितस्थळ गाठता येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Pahalgam Terror Attack : अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे का? शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया काय? Pahalgam Terror Attack : अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे का? शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया काय?
मंगळवारी पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू...
Sharad Pawar : पुलवामासह अनेक हल्ले झाले, तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही, आज का होतेय? शरद पवार यांचा सवाल
“या” लोकांनी आंबा खाल्ल्यास होईल नुकसान! तुम्हीही यादीत आहात का? वाचा सविस्तर!
महेश भट्ट-पूजा भट्ट यांच्या चुंबनावर पहिल्यांदाच बोलला राहुल भट्ट; म्हणाला, ‘आम्ही लहानपणापासून पाहत आलोय की…’
आपापल्या राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार करा, केंद्राचे राज्य सरकारांना आदेश
सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन, हजारो पर्यटक अडकले
Navi Mumbai Crime – सीवूडमध्ये नराधम स्कूल बस चालकाचा 4 वर्षांच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार