गुजरातमध्ये भरधाव बसने अनेकांना चिरडलं, 3 जणांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

गुजरातमध्ये भरधाव बसने अनेकांना चिरडलं, 3 जणांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

गुजरातमधील राजकोटमध्ये बुधवारी सकाळी एका भरधाव वेगात येणाऱ्या इलेक्ट्रिक बसने ट्रॅफिक सिग्नलवर उभ्या असलेल्या अनेक वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. राजकोट शहरातील एका वर्दळीच्या चौकात ही घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त जगदीश भांगरवा म्हणाले की, बसने दुचाकी, चारचाकी वाहने आणि पादचाऱ्यांना धडक दिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपघाताचे भयानक दृश्य समोर आले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला की, बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे याचा तपास पोलीस करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

यवतमाळमध्ये पाण्याकरिता वणवण करणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीचा करुण अंत, मोदी सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेचे पितळ उघड यवतमाळमध्ये पाण्याकरिता वणवण करणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीचा करुण अंत, मोदी सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेचे पितळ उघड
‘हर घर जल’ योजनेतून शहरांबरोबरच गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचविण्याच्या मोदी सरकारच्या योजनेचे पितळ उघडे पाडणारी हृदयद्रावक घटना यवतमाळमध्ये...
कोण नामदेव ढसाळ? या कार्यक्रमाचे आयोजन
पक्ष फोडण्यासाठी टोळ्यांसारखा पोलिसांचा वापर केला जातोय! उद्धव ठाकरे यांचे परखड मत
हिंदी सक्ती बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच! आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला
बीड पुन्हा हादरले; प्रदूषणाविरोधात लढणाऱ्या महिलेला लाठ्याकाठ्यांनी अमानुष मारहाण
मंत्री अतुल सावेंना दणका मुख्यमंत्र्यांनी कामे रोखली, नांदेड जिल्ह्यातील 7 कोटी 25 लाख रुपयांच्या तांडा वस्तीच्या कामांना स्थगिती
मोदींच्या घरकुल योजनेत साडेचारशे कोटींचा घोटाळा; मिंधेंच्या सत्ताकाळात कंत्राटदारांच्या तिजोऱ्या भरल्या! बदलापुरात आठ लाखांचे घर 17 लाखांवर