RSS आणि भाजप देशातील शिक्षण व्यवस्था आणि तरुणांचे भवितव्य उद्ध्वस्त करत आहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल

RSS आणि भाजप देशातील शिक्षण व्यवस्था आणि तरुणांचे भवितव्य उद्ध्वस्त करत आहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोमवारी INDIA आघाडीच्या विद्यार्थी संघटनांच्या जंतरमंतर येथे झालेल्या निदर्शनात सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसवक संघावर (आरएसएस) कडाडून टीका केली आहे. देशातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करत स्वतःचा छुपा अंजेडा राबवण्यासाठी एक संघटन कार्यरत आहे. आरएसएस आणि भाजप असे त्यांचे नाव आहे. देशातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करत ते तरुणांचे भवितव्य उद्ध्वस्त करत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

भाजप आणि आरएसएस देशातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या विचारात आहे. देशातील सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये आरएसएसने नियुक्त केलेले कुलगुरू आहेत. लवकरच राज्यांतील विद्यापीठांचे कुलगुरूही आरएसएसचे असतील. यंत्रणा त्यांच्या हातात पडली तर सर्व काही संपेल. देशातील सर्वात मोठी समस्या बेरोजगारी आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान कुंभमेळ्यावर बोलले होते. कुंभमेळ्यावर बोलणे चांगले आहे, पण त्यांनी देशाच्या भविष्याबद्दलही बोलले पाहिजे. त्यांनी बेरोजगारीविरुद्ध बोलावे. वाढत्या महागाईबाबत बोलावे, तरुणांच्या भविष्याबाबत बोलावे, वाढत्या महागाईबाबत बोलावे. मात्र, ते मूळ आणि गंभीर समस्यांवर बोलत नाहीत. मोदी सरकारने देशातील तरुणांना बेरोजगार केले, त्याबाबत आता जनतेनेच त्यांना जाब विचारला पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी बेरोजगारी, महागाई आणि शिक्षण व्यवस्थेवर बोलले पाहिजे. मात्र, भाजपची सर्व यत्रंणा अंबानी-अदानी यांच्यासाठी काम करत आहेत. अनेक मोठ्या उद्योगपतींची कर्ज माफ होत आहेत आणि जनता महागाईने होरपळत आहे. शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या उभ्या आहेत. देशातील या समस्यांबाबत पंतप्रधांनी बोलले पाहिजे. भाजप आणि आरएसएस शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या हातात शिक्षण व्यवस्था गेल्यास बेरोजगारीचे संकट आणि बिकट होणार आहे आणि तरुणांचे भवितव्यही उद्ध्वस्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आण्ही त्यांची विचारधारा नष्ट करण्यासाठी काम करू. विद्यार्थ्यांच्या हिताशी आम्ही तडजोड करणार नाही. आपण सर्वांनी मिळून सरकारचा सामना करू, असा निर्धारही राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘मशाल पेटवून खुशाल झोपणाऱ्यांना…’, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा सभागृहात घणाघात ‘मशाल पेटवून खुशाल झोपणाऱ्यांना…’, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा सभागृहात घणाघात
तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारताना बोट दाखवतात तेव्हा तीन बोट तुमच्याकडे असतात. उद्योजकाच्या घराखाली बॉम्ब पेरताना किंवा कंगना रणावत हिच्या...
एकनाथ शिंदेंनंतर आता कुणाल कामराचा भाजपच्या या मोठ्या महिला नेत्यावर निशाणा
आईच्या हट्टामुळे करिश्माची झालेली वाईट अवस्था, रक्त बंबाळ झालेली अभिनेत्री
कहते है इसको तानाशाही, देश मे इतनी महंगाई, सरकार के साथ है आई; कुणाल कामराचा आणखी एक व्हिडीओ, सरकारच्या धोरणांचे काढले वाभाडे
आजी आजोबांनी पुसला निरक्षरतेचा शिक्का, चंद्रपुरात वृद्ध नागरिक देणार परीक्षा
नाराजी नाट्यानंतर पालकमंत्री बदलले, वाशिम जिल्ह्याचे पालकत्व दत्तात्रय भरणेंकडे
Summer Diet Tips- उन्हाळ्यात आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा, दिवसभर ताजेतवाने राहाल!