Delhi Stampede – चेंगराचेंगरीनंतर तब्बल 40 मिनिटांनी आपत्कालीन कॉल, आरपीएफच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Delhi Stampede – चेंगराचेंगरीनंतर तब्बल 40 मिनिटांनी आपत्कालीन कॉल, आरपीएफच्या अहवालात धक्कादायक खुलासा

कुंभस्नानासाठी चाललेल्या भाविकांमध्ये 15 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. यात 18 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबाबत रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ)ने अहवाल सादर केला आहे. या अहवालात आरपीएफने धक्कादायक खुलासा केला आहे. दुर्घटना घडल्यानंतर आपत्कालीन कॉल तब्बल 40 मिनिटांनी करण्यात आल्याचे अहवालातून समोर आले आहे.

चेंगराचेंगरीबाबत रेल्वे, अग्निशमन अधिकारी आणि दिल्ली पोलिसांनी सांगितलेल्या वेळेत तफावत आहे. रेल्वेने त्यांच्या अधिकृत पत्रात दिलेल्या माहितीनुसार, रात्री 9.15 वाजता चेंगराचेंगरी झाली. तर दिल्ली अग्नीशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री 9.55 वाजता पहिला कॉल आला.

आरपीएफच्या हवाल्याने इंडिया टुडे ने दिलेल्या वृत्तानुसार, रात्री 8.48 वाजता चेंगराचेंगरी झाली आणि कर्तव्यावर असलेल्या स्टेशन प्रभारींना याची माहिती देण्यात आली होती, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

टीम इंडियाने बांगलादेशला लोळवलं, 6 गडी राखून केला पराभव; शुभमन गिलने झळकावलं शतक टीम इंडियाने बांगलादेशला लोळवलं, 6 गडी राखून केला पराभव; शुभमन गिलने झळकावलं शतक
टीम इंडियानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात विजयानं केली आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 6 गडी राखून...
लाडक्या बहि‍णींना भेटून आदिती तटकरे यांची महत्वाची घोषणा, काय म्हणाल्या ?
चार वर्षांच्या ब्रेकनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचं टीव्हीवर कमबॅक; आता मध्येच सोडला शो
Apple चा सर्वात स्वस्त iPhone लॉन्च, मिळणार जबरदस्त कॅमेरा आणि फीचर्स; जाणून घ्या किंमत
मुंबईतल्या गोरेगावमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल
जालन्यातील खरपुडी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री सचिवालयाकडून चौकशीचे आदेश, अंबादास दानवेंनी उठवला होता आवाज
100 व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवाची दमदार सुरुवात, सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झालं उद्घाटन