श्रद्धेसाठी कायपण! 13 दिवसांत 95 किलोमीटर लोटांगण, सांगलीचा भाविक जोतिबाचरणी लीन

श्रद्धेसाठी कायपण! 13 दिवसांत 95 किलोमीटर लोटांगण, सांगलीचा भाविक जोतिबाचरणी लीन

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवी स्वतः अनवाणी चालत दख्खनच्या राजाच्या भेटीला आली. या आख्यायिकेची परंपरा चालविणाऱ्या कोल्हापूरकरांच्या खेटे यात्रेस रविवारपासून (दि. 16) ‘चांगभलं’च्या गजरात सुरुवात झाली असतानाच सोमवारी चक्क लोटांगण घालत सांगलीच्या भक्ताने जोतिबाचरणी आपला माथा टेकविला. तब्बल 13 दिवस 95 कि.मी.चा प्रवास करीत दाखल झालेल्या सुरेश मुळीक (रा. शाळगाव, ता. कडेगाव) या भक्ताने ‘श्रद्धेसाठी कायपण’चा प्रत्यय दिल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचे दर्शन घेण्यासाठी 4 फेब्रुवारी रोजी सुरेश मुळीक यांनी सोबत 10 ते 12 सहकारी भक्तांना घेऊन टाळ-मृदंगांच्या गजरात आणि ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर करीत सांगली जिल्ह्यातील शाळगाव येथून वाडी रत्नागिरी येथील जोतिबा डोंगराकडे लोटांगण घालत कूच केले.

डांबरी रस्ते, सिमेंटचे रस्ते उन्हाने तापलेले, तर कुठे चिखल झालेले रस्ते अशा खाचखळग्यांनी भरलेल्या खडतर रस्त्यांवर गोणपाटाचे खास बनविलेले कपडे घालून, लोटांगण घालत मुळीक यांनी 13 दिवसांत तब्बल 95 कि.मी. चे खडतर अंतर पार करीत सोमवारी सकाळी श्री जोतिबा मंदिरात प्रवेश केला.

या काळात त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांनी टाळ-मृदंगांच्या गजरात आणि जोतिबाचा जयघोष करीत एका टेम्पोत जेवणाचे साहित्य घेऊन निघाले होते. दररोज सकाळी लवकर उठून लोटांगण घालत रोज नऊ ते दहा किलोमीटर प्रवास ते करीत. दुपारी काही विश्रांती घेऊन, जेवण करून पुन्हा सायंकाळी लोटांगण घालत रात्री सातपर्यंत पुढचा प्रवास ते करीत होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राजीनामा देताच संभाजी भिंडेंचा धनंजय मुंडेंना सल्ला म्हणाले…. राजीनामा देताच संभाजी भिंडेंचा धनंजय मुंडेंना सल्ला म्हणाले….
बीड जिल्ह्याच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सरकारकडून सीआयडीकडे सोपवण्यात आला...
Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर? सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
‘अ परफेक्ट मर्डर’चा महिला दिन विशेष प्रयोग; एक सरळ सोपी केस की न उलगडलेलं कोडं?
समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा जबरदस्त टीझर
विवाहित दिग्दर्शकासोबत ‘प्रेमसंबंध’, गरोदर राहिल्यानंतर अभिनेत्रीने अबॉर्शनसाठी मागितली इतकी रक्कम!
‘मन सुन्न करणारे फोटो’, संतोष देशमुख हत्या प्रकरणावर ‘हास्यजत्रा’मधील अभिनेत्याचा संताप
‘छावा’ मधील बालकलाकार हुबेहूब दिसतो सलमान खान सारखा, तेच डोळे, तसेच केस…, व्हिडीओ पाहून म्हणाल…